AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Orange | नागपुरी संत्री होणार आंबट? गळती लागल्यानं उत्पादनात घट; काय करता येईल उपाययोजना?

ही संत्रा गळती नेमकी कशामुळे होत आहे. याचा अभ्यास करून कृषी विभागाने शेतकऱ्यांना याची माहिती द्यावी, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकरी करत आहेत. संत्रावर आलेली ही गळती जर अशीच सुरू राहिली तर यामुळे शेतकऱ्यांनाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

Nagpur Orange | नागपुरी संत्री होणार आंबट? गळती लागल्यानं उत्पादनात घट; काय करता येईल उपाययोजना?
नागपुरात मोठ्या प्रमाणात संत्रा गळती. Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Apr 28, 2022 | 5:47 PM
Share

नागपूर : नागपुरी संत्रा जगप्रसिद्ध (World famous) आहे. त्यामुळे त्याची मागणी सर्वत्र आहे. मात्र यावर्षी संत्र्याच्या झाडावर संत्रा लागताच मोठ्या प्रमाणात संत्र्याची गळती होत आहे. यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत आला आहे. मात्र ही गळ जास्त उष्णतेमुळे होत आहे की नेमकं कारण काय याचा अभ्यास होण्याची गरज आहे. जगप्रसिद्ध नागपुरी संत्रा (Nagpur Orange) या वेळी कमी प्रमाणात येईल आणि महाग होईल की काय अशी परिस्थिती निर्माण होतात दिसते. कारण या वर्षी संत्र्याला बार येताच छोटी छोटी संत्रा झाडावरून गळून पडायला लागली. नागपूरसह संपूर्ण विदर्भात मोठ्या प्रमाणात तापमान (Temperature) वाढलं आहे. त्याचा फरक संत्रावर पडतो आहे का ? असा एक विचार शेतकऱ्यांनाच्या डोक्यात येत आहे.

संत्रा उत्पादकाला आधाराची गरज

मात्र ही संत्रा गळती नेमकी कशामुळे होत आहे. याचा अभ्यास करून कृषी विभागाने शेतकऱ्यांना याची माहिती द्यावी, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकरी करत आहेत. संत्रावर आलेली ही गळती जर अशीच सुरू राहिली तर यामुळे शेतकऱ्यांनाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्याला आधार द्यावं, असंही शेतकरी सांगतात.

संत्र्याला गळती लागण्याची कारण काय

नागपूर जिल्ह्यातील संत्रा प्रसिद्ध असल्याने त्याची मागणी मोठी आहे. मात्र संत्रा झाडावर लागताच त्याची गळ झाली तर शेतकऱ्यांनाच नुकसान होणार आहे. त्यामुळं यावर आताच पावलं उचलण्याची गरज आहे. यामागची नेमकी काय कारण आहेत. यावर काय उपाययोजना करता येतील, याची कृषी विभागानं माहिती द्यावी. संत्रा उत्पादकांचं नुकसान टाळावं, अशी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे.

Follow Us
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक.
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख....
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.