AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | पुण्यातील Phone Tapping प्रकरण, नाना पटोलेंनी ठोकला रश्मी शुक्ला यांच्या विरोधात 500 कोटींचा मानहानीचा दावा

भाजपची सत्ता राज्यात असताना सहा राजकीय नेत्यांचे फोन टॅप (Phone Tapping Case) करण्यात आले होते. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही नाव होते. या प्रकरणी फोन टॅप करणाऱ्या पुण्याच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात नाना पटोले यांनी मानहानीचा दावा नागपुरातील न्यायालयात दाखल केला.

Video | पुण्यातील Phone Tapping प्रकरण, नाना पटोलेंनी ठोकला रश्मी शुक्ला यांच्या विरोधात 500 कोटींचा मानहानीचा दावा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. Image Credit source: twitter
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Mar 24, 2022 | 2:24 PM
Share

नागपूर : पुणे येथील 2017-18 मध्ये फोन टॅपिंग (Phone Tapping Case) करण्यात आले होते. त्यावेळी रश्मी शुक्ला या पुण्याच्या आयुक्त (Rashmi Shukla Pune Commissioner) होत्या. राज्य सरकरानं चौकशी समिती नेमली होती. ही चौकशी पूर्ण झाली. समितीने याचा अहवाल पुणे येथील गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांच्याकडे सोपविण्यात आला. चांदगुडे यांनी शुक्ला आणि इतरांविरोधात 25 फेब्रुवारी 2022 रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावेळी सहा राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. या राजकीय नेत्यांचे फोननंबर वेगवेगळ्या नावांनी सेव्ह केले गेले होते. अमजद खान या नावाने नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांचा फोन टॅप करण्यात आला होता. हे सर्व करताना कायदेशीर मार्गाचा अवलंब केला गेला नव्हता.

नाना पटोले यांचे ट्वीट

नाना पटोले यांचं म्हणण काय

यासंदर्भात नाना पटोले म्हणाले, फोन टॅपिंग प्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. सरकारनं आश्वासन दिलं की, आम्ही चौकशी करतो. चौकशीच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे कारवाई करतो. सरकरानं संपूर्ण चौकशी केली. त्यावेळच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला ह्या त्याठिकाणी दोषी आढळल्या. त्यामुळं रश्मी शुक्ला यांच्या विरोधात आम्ही मानहानीचा दावा ठोकला आहे. हा दावा जवळपास 500 कोटी रुपयांचा आहे. या पद्धतीनं कुणाच्या व्यक्तिगत जीवनात जाऊन त्याला त्रास देणं. त्याला ब्लाकमेल करणं. ही पद्धत बंद व्हावी, या यामागचा उद्देश आहे. या सगळ्या षडयंत्राच्या मागे आणखी कोण-कोण आहे, ही स्पष्टता पुढं यावी.

नागपुरातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा

या दाव्यामध्ये केंद्रीय गृह विभागाचे सचिव, राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पुणे पोलीस आयुक्त, नागपूर पोलीस आयुक्त व पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांचा दाव्यातील इतर प्रतिवादींमध्ये समावेश आहे. नाना पटोले यांच्याकडून अॅड. सतीश उके व अॅड. वैभव जगताप यांनी कामकाज पाहिले. नाना पटोले यांनी केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या अतिरिक्त महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरोधात नागपुरातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे.

Video | आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी? Raju Shetti म्हणतात, पक्षात सक्रिय नाही

Nagpur Railways | रेल्वेत आधी मैत्री करून drinks ऑफर करायचा, नंतर गुंगीचे औषध देऊन चोरी करायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Wardha Crime | कैदेतून सुटीवर आले नि पसार झाले, 14 वर्षांनंतर फरार दोन गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली