AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, शरद पवार नेमकं काय म्हणालेत?

या अन्याय अत्याचार करणाऱ्या शक्ती विरोधात मशाली पेटवली पाहिजे.

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, शरद पवार नेमकं काय म्हणालेत?
शरद पवार नेमकं काय म्हणालेत? Image Credit source: tv 9
| Updated on: Oct 08, 2022 | 10:27 PM
Share

गजानन उमाटे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे आज भटके विमुक्त जमाती संघटना अधिवेशनाला नागपुरात उपस्थित होते. रेशीमबागमधील सुरेश भट सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. सुरेश भट यांच्या कवितेतील ओळ शरद पवार यांनी म्हणून दाखवली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असं सुरेश भट म्हणत होते. भटक्या जमातीच्या उत्थानासाठी या मशाली पेटविणं गरजेचं असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार यांनी सांगितलं की, यासाठी खबरदारी घ्यायची असेल तरी घ्या. भटके विमुक्त जमाती संघटनांनी 50 वर्षे कष्ट केलेय, त्याचं स्मरण करतोय. एक काळ असा होता की हा समाज गुन्हेगारी आहे, असा उल्लेख केला जायचा. 1952 साली त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भटक्या विमुक्तांवरचा गुन्हेगारी ठप्पा पुसला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर होते. प्रमुख पाहुणे शाहू छत्रपती, वामन मेश्राम, लक्ष्मण माने उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, भटक्या विमुक्त समाजाची शोषणापासून मुक्ती झाली, असं आजंही वाटत नाही. यातून मुक्तीसाठी शक्तीशाली संघटना उभी करावी लागेल.

शाहू महाराजांनी लहान समाजाला सन्मान देण्यासाठी अनेक गोष्टी केल्यात. त्यांचे मार्ग वेगळे होते काही लोकांना ते आवडले नसेल.

भटक्यांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी एकसंघ झाल्याशिवाय पर्याय नाही. संघटनेची शक्ती तुम्हाला सन्मानाने जगण्याचा आधार देईल. या अन्याय अत्याचार करणाऱ्या शक्ती विरोधात मशाली पेटवली पाहिजे.

बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले. औरंगाबादला शैक्षणिक सत्र सुरू केलं. फुले, शाहू, आंबेडकर यांचं नाव अग्रणी घेतलं जातं.

चार लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी मोफत शिक्षण घेतात. हे काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं.

संघटनेची शक्ती तुम्हाला सन्मान मिळवून देईल. जगण्याचं बळ देईल. संघटनेसाठी एकता असली पाहिजे.

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.