AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, शरद पवार नेमकं काय म्हणालेत?

या अन्याय अत्याचार करणाऱ्या शक्ती विरोधात मशाली पेटवली पाहिजे.

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, शरद पवार नेमकं काय म्हणालेत?
शरद पवार नेमकं काय म्हणालेत? Image Credit source: tv 9
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Oct 08, 2022 | 10:27 PM
Share

गजानन उमाटे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे आज भटके विमुक्त जमाती संघटना अधिवेशनाला नागपुरात उपस्थित होते. रेशीमबागमधील सुरेश भट सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. सुरेश भट यांच्या कवितेतील ओळ शरद पवार यांनी म्हणून दाखवली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असं सुरेश भट म्हणत होते. भटक्या जमातीच्या उत्थानासाठी या मशाली पेटविणं गरजेचं असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार यांनी सांगितलं की, यासाठी खबरदारी घ्यायची असेल तरी घ्या. भटके विमुक्त जमाती संघटनांनी 50 वर्षे कष्ट केलेय, त्याचं स्मरण करतोय. एक काळ असा होता की हा समाज गुन्हेगारी आहे, असा उल्लेख केला जायचा. 1952 साली त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भटक्या विमुक्तांवरचा गुन्हेगारी ठप्पा पुसला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर होते. प्रमुख पाहुणे शाहू छत्रपती, वामन मेश्राम, लक्ष्मण माने उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, भटक्या विमुक्त समाजाची शोषणापासून मुक्ती झाली, असं आजंही वाटत नाही. यातून मुक्तीसाठी शक्तीशाली संघटना उभी करावी लागेल.

शाहू महाराजांनी लहान समाजाला सन्मान देण्यासाठी अनेक गोष्टी केल्यात. त्यांचे मार्ग वेगळे होते काही लोकांना ते आवडले नसेल.

भटक्यांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी एकसंघ झाल्याशिवाय पर्याय नाही. संघटनेची शक्ती तुम्हाला सन्मानाने जगण्याचा आधार देईल. या अन्याय अत्याचार करणाऱ्या शक्ती विरोधात मशाली पेटवली पाहिजे.

बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले. औरंगाबादला शैक्षणिक सत्र सुरू केलं. फुले, शाहू, आंबेडकर यांचं नाव अग्रणी घेतलं जातं.

चार लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी मोफत शिक्षण घेतात. हे काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं.

संघटनेची शक्ती तुम्हाला सन्मान मिळवून देईल. जगण्याचं बळ देईल. संघटनेसाठी एकता असली पाहिजे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...