AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, शरद पवार नेमकं काय म्हणालेत?

या अन्याय अत्याचार करणाऱ्या शक्ती विरोधात मशाली पेटवली पाहिजे.

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, शरद पवार नेमकं काय म्हणालेत?
शरद पवार नेमकं काय म्हणालेत? Image Credit source: tv 9
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Oct 08, 2022 | 10:27 PM
Share

गजानन उमाटे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे आज भटके विमुक्त जमाती संघटना अधिवेशनाला नागपुरात उपस्थित होते. रेशीमबागमधील सुरेश भट सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. सुरेश भट यांच्या कवितेतील ओळ शरद पवार यांनी म्हणून दाखवली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असं सुरेश भट म्हणत होते. भटक्या जमातीच्या उत्थानासाठी या मशाली पेटविणं गरजेचं असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार यांनी सांगितलं की, यासाठी खबरदारी घ्यायची असेल तरी घ्या. भटके विमुक्त जमाती संघटनांनी 50 वर्षे कष्ट केलेय, त्याचं स्मरण करतोय. एक काळ असा होता की हा समाज गुन्हेगारी आहे, असा उल्लेख केला जायचा. 1952 साली त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भटक्या विमुक्तांवरचा गुन्हेगारी ठप्पा पुसला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर होते. प्रमुख पाहुणे शाहू छत्रपती, वामन मेश्राम, लक्ष्मण माने उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, भटक्या विमुक्त समाजाची शोषणापासून मुक्ती झाली, असं आजंही वाटत नाही. यातून मुक्तीसाठी शक्तीशाली संघटना उभी करावी लागेल.

शाहू महाराजांनी लहान समाजाला सन्मान देण्यासाठी अनेक गोष्टी केल्यात. त्यांचे मार्ग वेगळे होते काही लोकांना ते आवडले नसेल.

भटक्यांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी एकसंघ झाल्याशिवाय पर्याय नाही. संघटनेची शक्ती तुम्हाला सन्मानाने जगण्याचा आधार देईल. या अन्याय अत्याचार करणाऱ्या शक्ती विरोधात मशाली पेटवली पाहिजे.

बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले. औरंगाबादला शैक्षणिक सत्र सुरू केलं. फुले, शाहू, आंबेडकर यांचं नाव अग्रणी घेतलं जातं.

चार लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी मोफत शिक्षण घेतात. हे काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं.

संघटनेची शक्ती तुम्हाला सन्मान मिळवून देईल. जगण्याचं बळ देईल. संघटनेसाठी एकता असली पाहिजे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान