AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ‘स्वाभीमानी’ आक्रमक; आजपासून तुपकरांचे बेमुदत उपोषण

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा पेटन्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटना रिंगणात उतरली आहे. कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 'स्वाभीमानी' आक्रमक; आजपासून तुपकरांचे बेमुदत उपोषण
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 12:03 PM
Share

नागपूर – कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा पेटन्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटना रिंगणात उतरली आहे. कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. आपल्या मागणीसाठी तुपकर हे आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. ते नागपूरच्या संविधान चौकात उपोषणाला बसणार आहेत.

मराठवाडा, विदर्भातील प्रत्येक गावात प्रभात फेरी 

विदर्भाप्रमाणाचे मराठवाड्यात देखील मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन शेतकरी आहेत. खर्चाच्या तुलनेमध्ये कापसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी 18 नोव्हेंंबरला स्वाभिमानिच्या वतीने मराठवाडा आणि विदर्भातील प्रत्येक गावांमध्ये प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. तसेच याच दिवशी धरणे आणि ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून संघटनेच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

रास्तारोको आंदोलन 

त्यानंतर 19 नोव्हेंबरला आपल्या मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विदर्भ आणि मराठवाड्यात विविध ठिकाणी रास्तारोको आंदोलन देखील करण्यात येणार आहे. जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांची दखल घेत नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे तुपकर यांनी म्हटले आहे.आमचा हा लढा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी असून, जोपर्यंत मालाला योग्य भाव मिळणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचेही ते म्हणाले आहेत.

तुपकर यांना पोलिसांचे पत्र 

दरम्यान त्रिपुरामध्ये मशिदीवर झालेल्या कथील हल्ल्याचे पडसाद विदर्भात उमटल्याचे पहायला मिळाले होते. अमरावतीमध्ये हिंसाचार उसळला होता, जमावाकडून दगडफेक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी करण्यात आली आहे. संचारबंदी असल्याने तुपकर यांनी आंदोलन कुरू नये असे पोलिसांनी म्हटले आहे. आंदोलनासंदर्भांत पोलिसांनी तुपकर यांना एक पत्र देखील पाठवले आहे. ज्यामध्ये संचारबंदी असल्याने आंदोलन करू नका असे म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

कोण होतास तू… काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू; फडणवीसांची राऊतांवर जळजळीत टीका!

सुधीर मुनगंटीवार सोनार कधीपासून झाले?, राजकारणी आहात, कॅरेट तपासत बसू नका; अनिल परबांचा टोला

Follow Us
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित.