कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ‘स्वाभीमानी’ आक्रमक; आजपासून तुपकरांचे बेमुदत उपोषण

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा पेटन्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटना रिंगणात उतरली आहे. कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 'स्वाभीमानी' आक्रमक; आजपासून तुपकरांचे बेमुदत उपोषण
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 12:03 PM

नागपूर – कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा पेटन्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटना रिंगणात उतरली आहे. कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. आपल्या मागणीसाठी तुपकर हे आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. ते नागपूरच्या संविधान चौकात उपोषणाला बसणार आहेत.

मराठवाडा, विदर्भातील प्रत्येक गावात प्रभात फेरी 

विदर्भाप्रमाणाचे मराठवाड्यात देखील मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन शेतकरी आहेत. खर्चाच्या तुलनेमध्ये कापसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी 18 नोव्हेंंबरला स्वाभिमानिच्या वतीने मराठवाडा आणि विदर्भातील प्रत्येक गावांमध्ये प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. तसेच याच दिवशी धरणे आणि ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून संघटनेच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

रास्तारोको आंदोलन 

त्यानंतर 19 नोव्हेंबरला आपल्या मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विदर्भ आणि मराठवाड्यात विविध ठिकाणी रास्तारोको आंदोलन देखील करण्यात येणार आहे. जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांची दखल घेत नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे तुपकर यांनी म्हटले आहे.आमचा हा लढा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी असून, जोपर्यंत मालाला योग्य भाव मिळणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचेही ते म्हणाले आहेत.

तुपकर यांना पोलिसांचे पत्र 

दरम्यान त्रिपुरामध्ये मशिदीवर झालेल्या कथील हल्ल्याचे पडसाद विदर्भात उमटल्याचे पहायला मिळाले होते. अमरावतीमध्ये हिंसाचार उसळला होता, जमावाकडून दगडफेक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी करण्यात आली आहे. संचारबंदी असल्याने तुपकर यांनी आंदोलन कुरू नये असे पोलिसांनी म्हटले आहे. आंदोलनासंदर्भांत पोलिसांनी तुपकर यांना एक पत्र देखील पाठवले आहे. ज्यामध्ये संचारबंदी असल्याने आंदोलन करू नका असे म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

कोण होतास तू… काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू; फडणवीसांची राऊतांवर जळजळीत टीका!

सुधीर मुनगंटीवार सोनार कधीपासून झाले?, राजकारणी आहात, कॅरेट तपासत बसू नका; अनिल परबांचा टोला

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.