AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrasekhar Bawankule : सरपंचाची निवड जनतेतूनच करा, चंद्रशेखर बावनकुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, शिंदे सरकार ठाकरेंचा निर्णय बदलविणार?

यापुढं होणाऱ्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेमधून निवडून यावा. अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यासंदर्भात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

Chandrasekhar Bawankule : सरपंचाची निवड जनतेतूनच करा, चंद्रशेखर बावनकुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, शिंदे सरकार ठाकरेंचा निर्णय बदलविणार?
एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jul 13, 2022 | 4:41 PM
Share

मुंबई : राज्यातील सरपंचांची निवडणूक 2017 मध्ये फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे थेट जनतेतूनच करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही सादर केले आहे. या निवेदनात आमदार बावनकुळे यांनी म्हटले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2017 मध्ये सरपंचाची निवड जनतेतूनच करावी असा निर्णय घेतला. मात्र महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय (Decisions) बदलून सरपंचाची निवडणूक ग्रामपंचायतीवर निवडून आलेल्या सदस्यांमार्फत करण्याचा निर्णय घेतला. 2017 पूर्वी सरपंचाची निवड ग्रामपंचायत (Gram Panchayat) सदस्यांमार्फतच होत असे. मात्र वारंवार अविश्वास ठराव मांडण्याच्या खेळामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात अडथळे (Obstacles) निर्माण होत असत. अविश्वास ठराव आणला गेल्यानंतर घोडेबाजाराला ऊत येत असे.

फडणवीस सरकारचाच निर्णय कायम ठेवावा

सरपंचाच्या निवडणुकीत घोडेबाजाराची परिस्थिती टाळण्यासाठी व ग्रामपंचायत कारभाराला स्थिरता येण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने सरपंचाची निवड जनतेतून करण्याची शिफारस राज्य सरकारला केली होती. या शिफारशीनुसार 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सरपंच निवड जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय महाविकास आघाडी सरकारने बदलला. राज्य सरपंच संघटनेनेही सरपंचाची निवड निर्वाचित सदस्यांमार्फत करण्यास विरोध दर्शवला होता. आता नवीन सरकारने फडणवीस सरकारचाच निर्णय कायम ठेवावा असेही आमदार बावनकुळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

ठाकरे सरकारचा निर्णय बदलणार का?

यापुढं होणाऱ्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेमधून निवडून यावा. अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यासंदर्भात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. फडणवीस सरकारनं अशाप्रकारे सरपंचांची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, उद्धव ठाकरे सरकारनं हा निर्णय बदलला होता. नगराध्यक्ष व सरपंचांची निवड नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्यांकडून करण्यात यावी, असे आदेश दिले होते. आता ठाकरे सरकारचा निर्णय रद्द करून फडणवीस सरकारनं घेतलेला निर्णय लागू करावा, अशी मागणी बावनकुळे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत