AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषी पंपांची वीज तोडणी थांबवा, किशोर तिवारी यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

कृषी पंपाना देण्यात येणारी विजेची वेळ ही शेतकऱ्यांसाठी त्रासदायक आहे. ही वेळही बदलून देण्याची मागणी होत आहे. कारण रात्री मिळणारी वीज रात्री 11 वाजताऐवजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळात पुरवण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

कृषी पंपांची वीज तोडणी थांबवा, किशोर तिवारी यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना किशोर तिवारी.
| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 3:58 PM
Share

नागपूर : विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर, धान या पिकांचे नुकसान झालंय. असं असताना वीज वितरणनं कृषी पंपांची वीज तोडणीचा सपाटा लावलाय. यावर आळा बसावा, यासाठी कृषीपंपांची वीज तोडणी थांबवा, अशी विनंती वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

चालू खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णतः बुडाला. आता शेतकऱ्यांची सर्वस्वी मदार रब्बी पिकांवर आहे. वीज वितरण कपंनीनं वीज तोडणी केल्यामुळं शेतकऱ्यांच्या कामात बाधा येत आहे. शेतकऱ्यांशी सहकार्यानं वागावे व कृषीपंपाची वीज तोडणी त्वरित थांबावी, अशी विनंती अनेक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. सध्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळं आपण शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून व्यक्त केली आहे.

थकबाकीसाठी सक्ती नको

सनदी अधिकारी मंत्रालयात आपल्या वातानुकूल चेंबरमध्ये बसून सक्तीच्या वसुलीसाठी रोज नवीन-नवीन आदेश काढतात. वीज कंपनीचे अधिकारी एकीकडे वीज तोडणी वा रोहित्रे-ट्रान्सफार्मर दुरुस्तीसाठी 100 टक्के थकबाकीचा भरणा करा, अशी सक्ती करतात. मात्र अशी सक्ती नापिकीग्रस्त वा दुष्काळग्रस्त भागात करता येत नाही. वीज वितरण कंपनीचे अभियंता सरळ ऊर्जामंत्र्यांशी बोला, असा सल्ला देत आहेत.

वीज रात्रीऐवजी दिवसा पुरवावी

कृषी पंपाना देण्यात येणारी विजेची वेळ ही शेतकऱ्यांसाठी त्रासदायक आहे. ही वेळही बदलून देण्याची मागणी होत आहे. कारण रात्री मिळणारी वीज रात्री 11 वाजताऐवजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळात पुरवण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. रोहित्रे व इतर दुरुस्ती करून शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करावा, असेही किशोर तिवारी यांनी म्हटले.

राणे म्हणाले, मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार; नाना पटोले म्हणतात, भाजपच्या भविष्यवाणीला काही अर्थ नाही

MLC ELECTION नागपूर आणि अकोला थेट लढत होणार, नागपुरात बावनकुळे, भोयर यांच्यात सामना

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.