AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Temprature : पुढच्या पाच दिवसानंतर पुन्हा उष्णतेची लाट, चंद्रपुरात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाणार

मार्च महिन्यात वाढलेलं तापमान आत्तापर्यंत जैसे थे राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच एप्रिल महिन्यात सुध्दा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत उष्माघाताने महाराष्ट्रात 374 रूग्ण आजारी आहेत

Temprature : पुढच्या पाच दिवसानंतर पुन्हा उष्णतेची लाट, चंद्रपुरात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाणार
पुढच्या पाच दिवसानंतर पुन्हा उष्णतेची लाटImage Credit source: twitter
| Edited By: | Updated on: May 02, 2022 | 2:14 PM
Share

नागपूर – एप्रिल महिन्यात नागपूरसह (Nagpur) विदर्भातील तापमान (Temprature) 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं होतं. आता मे महिन्यातंही उकाड्यापासून कुठलाही दिलासा मिळणार नाही. मे महिन्यात उकाडा कायम राहणारा आहे. पुढच्या पाच दिवसानंतर विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave)इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे मे महिन्यात सुद्धा उकाडा कायम असणार आहे” अशी माहिती नागपूर हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ भावना यांनी दिली आहे. विशेष म्हणजे पुढच्या तीन दिवसात विदर्भात हलक्या पध्दतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मे महिन्यात उकाड्यापासून अजिबात दिलासा मिळणार नसल्याचं हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात 374 रूग्ण आजारी आहेत

मार्च महिन्यात वाढलेलं तापमान आत्तापर्यंत जैसे थे राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच एप्रिल महिन्यात सुध्दा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत उष्माघाताने महाराष्ट्रात 374 रूग्ण आजारी आहेत. तर 25 जणांचा बळी गेल्याची शक्यता राज्याच्या आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. कामाव्यतिरिक्त उन्हात जाऊ नये, त्याचबरोबर अधिक पाणी पिण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. काल सुरू झालेल्या मे महिन्यात तापमान असंच राहील. त्याचबरोबर तापमानात वाढ होण्याची शक्यता सुध्दा हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुढच्या पाच दिवसानंतर उष्णतेची लाट पुन्हा येणार आहे. पुढचे तीन दिवस विदर्भात हलक्या पावसाचा इशारा होण्याची शक्यता देखील आहे.

वाढत्या उन्हाचा आंबा बागेला फटका, 5 एकर वरील बाग जळून खाक

वाढत्या उन्हाचा व शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीचा आंबा बागेला फटका बसला आहे. कळंब तालुक्यातील दिगंबर कापसे यांची 5 एकरवरील बाग जळून खाक झाली आहे. यामुळे शेतकऱ्याचे 10 लाखांचे नुकसान झाले आहे. जळलेल्या बागेचा पंचनामा करण्यासाठी कृषी खात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.