AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबानी यांचा अँटालिया, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांचे बंगले बॉम्बने उडवून देण्याची धमकी; निनावी फोनने पोलिसांची झोप उडवली

दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी 25 सशस्त्र लोक मुंबईतील दादरला पोहोचणार आहेत, अशी धमकीही निनावी फोन करणाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली आहे.

मुकेश अंबानी यांचा अँटालिया, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांचे बंगले बॉम्बने उडवून देण्याची धमकी; निनावी फोनने पोलिसांची झोप उडवली
mukesh ambaniImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 01, 2023 | 7:01 AM
Share

नागपूर : नागपूर पोलीस कंट्रोलला काल एक फोन आला आणि सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने थेट मुंबईतील प्रसिद्ध लोकांची घरेच बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, बिग बी अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचे बंगले बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या फोन नंतर नागपूर पोलीस अलर्ट झाले असून फोन करणाऱ्या इसमाचा शोध गेत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांचा अँटालिया बंगला उडवून देण्याची धमकी दिली आहे. तसेच अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचे बंगलेही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. हा धमकीचा फोन आल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून फोन करणाऱ्याचा कसून शोध घेत आहे. पोलिसांच्या 112 क्रमांकावर पालघरमधून हा फोन आल्याचं सांगितलं जात आहे.

काय आहे प्रकरण?

एका अज्ञात व्यक्तीने नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन केला. मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या घराबाहेर बॉम्ब लावण्यात आल्याचं म्हटलं. त्यानंतर नागपूर पोलिसांनी मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. मुंबई पोलीस तात्काळ सतर्क झाली. मुंबई पोलिसांच्या बॉम्ब निरोधक पथकाने तात्काळ तिन्ही ठिकाणी जाऊन तपासणी केली. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी 25 सशस्त्र लोक मुंबईतील दादरला पोहोचणार आहेत, अशी धमकीही निनावी फोन करणाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली आहे. हे लोक कधी मुंबईत पोहोचणार आहेत. ते कुठे कुठे हल्ले करणार आहेत. याची काहीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलीस चक्रावून गेले असून पोलिसांनी फोन ट्रेस करण्यास सुरुवात केली आहे.

दोन वर्षापूर्वी दोघे अटकेत

दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या घरी आणि तीन रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवल्या प्रकरणी 2021मध्ये पोलिसांनी दोन लोकांना अटक केली होती. या आरोपींना ठाण्यातून अटक करण्यात आली होती. तर, 2021मध्येच मुकेश अंबानी यांच्या अँटालिया बंगल्याबाहेर 20 जिलेटिन स्टिक असलेली एक कार आढळली होती. यावेळी एक नोट सापडली होती. त्यावर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आळी होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. सध्या हे प्रकरण एनआयए हाताळत आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.