AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहान मुलांना सोडून पोटापाण्यासाठी नागपुरात आले, नियतीने घेतला दाम्पत्याचा असा बळी

मनीषनगर येथील गुरुछाया सोसायटीतील सांझविला येथे ते मजुरीचे काम करायचे. राहण्यासाठी ठेकेदाराने त्यांना टिनाच्या झोपडीची व्यवस्था करून दिली होती.

लहान मुलांना सोडून पोटापाण्यासाठी नागपुरात आले, नियतीने घेतला दाम्पत्याचा असा बळी
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Apr 22, 2023 | 2:39 PM
Share

नागपूर : नागपूर हे उपराजधानीचे शहर. आजूबाजूच्या गावातील लोकं येथे रोजगारासाठी येतात. बालाघाट, शिवणी, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातून काही लोकं कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त नागपूर गाठतात. नागपूर हे जवळ असलेले रोजगाराचे हमखास शहर. पण, आता नागपूर शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्या लोकांची तात्पुरती व्यवस्था केली जाते. पण, वादळ वाऱ्यात अशा झोपड्या निस्तनाबूत होतात. त्यात नुकसान होण्याची शक्यता मोठी असते. गुरुवारी आलेल्या वादळात टिनाचे शेड पडून दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली.

टिनाचे शेड पडून दोघांचा मृत्यू

छत्तीसगड येथील गौरीलाल पटेल (वय ३२) आणि त्यांची पत्नी रामला गौरीलाल पटेल (वय ३१) हे दोघेही नागपुरात मजुरीच्या कामासाठी आले. ते बलोदा बाजार येथील सोलदा गावचे रहिवासी. मनीषनगर येथील गुरुछाया सोसायटीतील सांझविला येथे ते मजुरीचे काम करायचे. राहण्यासाठी ठेकेदाराने त्यांना टिनाच्या झोपडीची व्यवस्था करून दिली होती.

टिनाचे शेड डोक्यावर पडल्याने मृत्यू

टिनाच्या झोपडीतील टीन वादळवाऱ्यात उडाले. त्यानंतर ते झोपडीत पडले. यावेळी दोघेही पती-पत्नी यांच्या डोक्यावर ते टीन पडले. यांत ते गंभीर जखमी झाले. त्यांनी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

दोन्ही मुले झाली पोरकी

पटेल दाम्पत्याने काम करून घरी मुलांच्या पालनपोषणासाठी पैसे पाठवण्याचे ठरवले होते. गावातच दोन्ही मुलांना ठेवले होते. एक तीन वर्षांचा तर दुसरा पाच वर्षांचा अशा लहान मुलांना गावी ठेवून ते पोट भरण्यासाठी नागपूरला आले होते.

पण, निसर्गाच्या तांडवात होत्याचे नव्हते झाले. या दोघांचाही मृत्यू झाला. त्यामुळे दोन्ही लहान मुले पोरकी झालीत. पटेल यांच्या कुटुंबीयांचे आता पालनपोषण कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

घटनेनंतर बेलतरोडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल मेश्राम घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या भागात बांधकाम सुरू आहेत. मजूर टिनाच्या झोपड्यांमध्ये राहतात. गुरुवारी आलेल्या वादळी पावसाने अनेकांच्या घराचे छत उडाले.

Follow Us
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद