दिनेश दुखंडे, नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगाने घडामोडी घडत आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे संबंधित प्रकरणावरुन विधानसभेत गदारोळ झालाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी समिती स्थापन करुन त्या समितीमार्फत चौकशी होईल, असं घोषित केलंय. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत आता आदित्य ठाकरे यांच्या समर्थनासाठी ठाकरे गटही कामाला लागला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: आपल्या शिष्टमंडळासह नागपुरात पुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.