Load shedding | वीज भारनियमनामुळे पाणी नाही, मिरचीच्या पिकावर रोग, नांदेडमधील शेतकऱ्यांवर संकट

नांदेडमधील वाढत्या उन्हासह लोडशेडिंगचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सिंचनासाठी लाईट उपलब्ध नसल्याने मिरचीच्या पिकांवर रोग पसरलाय.

Load shedding | वीज भारनियमनामुळे पाणी नाही, मिरचीच्या पिकावर रोग, नांदेडमधील शेतकऱ्यांवर संकट
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 11:05 AM

नांदेडः दिवसेंदिवस वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी (farmers) हैराण झाले आहेत. यंदा मार्च महिन्यापासूनच तळपत्या सूर्याची उष्णता (Heat wave) झेलावी लागत आहेत. अशा स्थितीत भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना पिकाचं रक्षण कसं करावं, असा प्रश्न पडत आहे. त्यातच महावितरणकडून सातत्याने वीजेचं भारनियमन (Load Shedding) केलं जात आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी लाईटही उपलब्ध नाही. परिणामी हाता-तोंडाशी आलेली भाजीपाल्याची पिकं नष्ट होत आहेत. नांदेडमधल्या मिरची उत्पादक शेतऱ्यांसमोर तर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. त्यातच येत्या मे महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

पाण्याअभावी मिरचीवर रोग

नांदेडमधील वाढत्या उन्हासह लोडशेडिंगचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सिंचनासाठी लाईट उपलब्ध नसल्याने मिरचीच्या पिकांवर रोग पसरलाय. त्यामुळे मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. ठोक बाजारात हिरव्या मिरचीला एका किलोला शंभर रूपायापर्यंतचा भाव मिळतोय. मात्र वाढत्या उष्णतेपाठोपाठ सिंचनाला लाईट मिळेनाशी झाली आहे. मिरची उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. चिट मोगरा या गावातील शेतकऱ्यांने दीड एकर क्षेत्रावर मिरचीची लागवड केली. मात्र आता विपरीत स्थितीत दर आठवड्याला 18 ते 25 किलो इतक्याच मिरचीचे उत्पादन होत असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितलंय.

मे महिन्यात सूर्य तळपणार

दरम्यान, मार्च आणि एप्रिल महिन्यात प्रखर उष्णतेच्या झळा सोसल्यानंतर मराठवाड्यात मे महिन्यातही उष्णतेची लाट येणार असल्याचा हवामानाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन कृषी विद्यापीठांतर्फे करण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात मराठवाड्यातील अनेक ठिकाणी 40 अंश सेल्सियसच्या पुढे तापमान गेलं होतं. औरंगाबाद, नांदेडमध्ये 41 अंशांच्या पुढे पारा गेला होता. आता मे महिन्यात ही उष्णता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच कोळशाच्या टंचाईमुळे भारनियमनाचे संकट राज्यावर घोंगावत आहे. असा स्थितीत पिकांची काळजी घेण्याचं मोठं आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.

इतर बातम्या-

Sanjay Raut | त्यांना खाजवण्याची सवयच आहे, एक दिवस चमडी फाटणार.. संजय राऊतांनी काय दिला इशारा?

Koffee With Karan 7: लग्नानंतर रणबीर-आलिया पहिल्यांदा टीव्हीवर येणार एकत्र; करण जोहरने ‘या’ सेलिब्रिटींनाही केलं आमंत्रित

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.