AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! 4 भाविकांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

Nanded Accident News : नांदेडच्या किनवट तालुक्यातील तोटंबा घाटात झालेल्या या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! 4  भाविकांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर जखमी
Nanded Accident NewsImage Credit source: Google
| Updated on: Aug 31, 2026 | 10:50 PM
Share

नांदेडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सहस्रकुंड धबधबा येथे महादेवाचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या कमांडर जीपला भीषण अपघात झाला. किनवट तालुक्यातील तोटंबा घाटात झालेल्या या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील कुबीर मंडळातील पारडी येथील रहिवासी असलेले काही प्रवासी सहस्रकुंड धबधबा येथे महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून ते कमांडर जीपने तेलंगणाकडे परतत असताना तोटंबा घाटात हा भीषण अपघात घडला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळल्याची प्राथमिक माहिती आहे. धडक इतकी भीषण होती की, या दुर्घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींवर उपचार सुरू

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जीपमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी तेलंगणा राज्यातील कुबीर येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, अपघातग्रस्त कमांडर जीप ही सहस्रकुंड ते तेलंगणा दरम्यान नियमित प्रवासी वाहतूक करणारी असल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातामुळे सहस्रकुंड परिसरात शोककळा पसरली असून, अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे.

मालाडमध्ये भरधाव वाहनाचा थरार,3 रिक्षांसह दुचाकीला धडक, महिलेचा मृत्यू

मुंबईच्या मालाडमध्ये भरधाव वाहनाने रिक्षा आणि दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना काल रात्री मालाड येथील एस. व्ही. रोड आणि मामलेदार वाडी रोडच्या जंक्शनवर घडली. या प्रकरणी पोलिसांनी 70 वर्षीय चालकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा शांताराम चमनकर हे एमजी विंसर वाहनाने भरधाव वेगात जात असताना तीन रिक्षा आणि एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात मोटरसायकल चालकासह एकूण सहा जण जखमी झाले. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या भीषण अपघातात प्रियांका शाह या महिलेचा मृत्यू झाला आहे. प्रियांका शाह या व्यवसायाने वकील असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना नागरिकांच्या मदतीने आणि पोलिसांच्या उपस्थितीत तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Follow Us
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या PRO बाबत
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या दिवंगत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख...
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख... 2 कोटी 7 लाख लोकांची नावे वगळली
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...