AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसध्ये मुख्यमंत्रिपदाचे 10 उमेदवार, त्यामुळे…; अजित पवार गटाच्या मंत्र्याच्या विधानाने चर्चाच चर्चा

Anil Patil on Congress : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याने काँग्रेसबाबत मोठं विधान केलं आहे. आगामी विधानसभा निवडणूक आणि मुख्यमंत्रिपद यावर देखील भाष्य केलंय. विधान परिषद निवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? वाचा सविस्तर...

काँग्रेसध्ये मुख्यमंत्रिपदाचे 10 उमेदवार, त्यामुळे...; अजित पवार गटाच्या मंत्र्याच्या विधानाने चर्चाच चर्चा
मंत्री अनिल पाटील
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jul 06, 2024 | 1:31 PM
Share

काँग्रेस पक्षामध्ये मुख्यमंत्रिपदाचे 10 उमेदवार आहेत. त्यामुळे काँग्रेसला 288 जागा लढवल्याशिवाय पर्याय नाही. शिवसेनेच्या एक मुखवटा पुढे करून काँग्रेसमध्ये खलबत्त व्हायला लागले आहे. राज्यात काँग्रेसची ज्या पद्धतीने वाटचाल सुरू आहे. त्यावरून ठाकरे आणि पवार काँग्रेसला कुठेतरी धोका देऊ शकतो. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे काँग्रेसला एकटे पाडतील अशी काँग्रेसला भीती आहे. त्यामुळे काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांचं हे विधान सध्या चर्चेत आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीवर प्रतिक्रिया

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आमच्याकडे मतदानाच्या संख्याबळ पूर्ण आहे. त्यामुळे आमचे उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीकडे मतांच्या संख्याबळ नाही आहे. फक्त पैशांच्या भरोशावर त्यांनी उमेदवार उभे केले आहेत, असा आरोपही अनिल पाटलांनी केला आहे. नंदुरबारमध्ये अनिल पाटील टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

मराठा आरक्षणावर अनिल पाटील काय म्हणाले?

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील हे आग्रही आहेत. त्यांनी ही मागणी लावून धरली आहे. आज मनोज जरांगे पाटील हिंगोलीत आहेत. जरांगे पाटील यांची रॅली सध्या सुरू आहे. यावरही अनिल पाटील यांनी भाष्य केलं आहे.  मनोज जरांगे पाटील यांनी काय करावं? हा त्यांच्या निर्णय आहे. मात्र राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. मराठा समाजातील सग्या सोऱ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक विचार करत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 288 उमेदवारांना उभं करावं का नाही करावं हा त्यांच्या भाग आहे. कुठलाही उमेदवार बिनविरोध निवडून येत नाही, असंही अनिल पाटील म्हणाले.

लाडकी बहिण योजनेवरही अनिल पाटील यांनी भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सर्व महिला पात्र ठरतील. या योजनेपासून कुठलीही महिला वंचित राहणार नाही. 31 ऑगस्ट या योजनेची मुदत आहे. त्यामुळे महिलांना येणाऱ्या अडचणी लवकर सोडवल्या जातील, असं अनिल पाटील म्हणाले.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली