AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात समान नागरी कायदा आल्यास स्वातंत्र्य संपेल; बकरी ईदच्या दिवशी MIM च्या आमदाराचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

MIM MLA Mufti Ismail on Uniform Civil code : समान नागरी कायदा देश हिताचा नाही, तो लागू करू नये; MIM च्या आमदाराची केंद्र सरकारकडे मागणी

देशात समान नागरी कायदा आल्यास स्वातंत्र्य संपेल; बकरी ईदच्या दिवशी MIM च्या आमदाराचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
| Updated on: Jun 29, 2023 | 2:04 PM
Share

मालेगाव, नाशिक : आज बकरी ईद आहे. सगळीकडे ईदचा उत्साह पाहायला मिळतो आहे. ठिकठिकाणी नमाज अदा केली जात आहे. एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी ईदच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. त्याच सोबत टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर घणाघात केलाय. समान नागरी कायद्यावरून मुफ्ती इस्माईल यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय.

समान नागरिक कायदा देश हिताचा नाही. भारतात 839 पर्सनल लॉ आहेत. जे बदलू शकत नाहीत. कुणा कुणाचा कायदा बदलणार आहात? असा सवाल मुफ्ती इस्माईल यांनी विचारला आहे.

मालेगावमध्ये नमाज पठण

बकरी ईदनिमित्त नाशिकच्या मालेगावमध्ये नमाज अदा करण्यात आली. नाशिकच्या इदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण करण्यात आलं. ईद आणि आषाढीनिमित्त पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. नाशिकच्या ईदगाह मैदानाच्या नमाजसाठी शेकडो मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली होती. तेव्हा बोलताना मुफ्ती इस्माईल यांनी केंद्र सरकारवर घणाघात केला आहे.

भारत हा सुंदर देश आहे. त्याचं कारण म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक राहतात. सर्व धर्म आनंदाने आणि गुण्यागोविंदाने राहतात. समान नागरिक कायदा आला तर स्वतंत्रता संपेल. समान नागरी कायदा लागू झाला तर देशातले बहुसंख्य लोक विरोध करतील आणि कारण अनेक लोकांचं स्वातंत्र्य संपेल, असं मुफ्ती इस्माईल यांनी म्हणाले आहेत.

पसमंदा (दारिद्री) मुस्लिमांना समान नागरी कायद्याचा फायदा होईल असे नाही. अच्छे दिन ची वाट भारतातला प्रत्येक नागरिक पाहत आहे ते आलेच नाहीत. मुसलमानांची पसमानंदगी संपेल. हे लाकडाचे लाडू आहेत, असं म्हणत मुफ्ती इस्माईल यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलंय.

आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे या समान नागरी कायद्याला विरोध करण्याचा या देशातील प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. लोकांचा या कायद्याला विरोध आहे आणि लोक तो विरोध करतील, असं मुफ्ती इस्माईल यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.