AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांचे आरोप ही भाजपची स्क्रिप्ट; ‘त्या’ गौप्यस्फोटांवर संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Sanjay Raut on Ajit Pawar Statement About Sharad Pawar and Supriya Sule : अजित पवार यांचे गौप्यस्फोट अन् अजित पवार गटाची भूमिका; संजय राऊत यांचे भाजपवर गंभीर आरोप... नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना काय म्हणाले संजय राऊत? वाचा सविस्तर...

अजित पवार यांचे आरोप ही भाजपची स्क्रिप्ट; 'त्या' गौप्यस्फोटांवर संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
संजय राऊत
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 02, 2023 | 9:20 AM
Share

चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नाशिक | 02 डिसेंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल कर्जतमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भूमिकेबाबत मोठे गौप्यस्फोट केले. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार बोलताय ती भाजपची स्क्रिप्ट आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना ठरविण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. चारित्र्यहनन करत आहेत. खोटे आरोप अल कायदा टेरेर्स काम करत होती तसे भाजप करत आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

भाजपने पक्ष आणि घर फोडली आहेत. आता नेते तुटत नाहीत. म्हणून चारित्र्यावर हल्ला केला जातोय. अजित पवार आणि शिंदे गटाने त्यांचा मार्ग निवडला. त्यांनी तसं जावं. सध्या अजितदादा नाही बोलत नाहीत. तर भाजप बोलतंय. शिवसेना आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रच्या अस्मितेसाठी काम करणारे पक्ष आहेत. या पक्षांना भाजप संपवू पाहात आहे. पण तसं होणार नाही. राज्यातील जनता आमच्यासोबत आहे. भविष्यात महाराष्ट्रात आणि देशात आमचं सरकार येईल, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

‘ती’ त्यांची भूमिका

बारामतीसह अन्य ठिकाणी लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा काल अजित पवार यांनी केली. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ती अजित पवार यांची भूमिका आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना संपवण्याण्यासाठी भाजपकडून षड्यंत्र रचलं जात आहे. संघाचं हे कारस्थान आणि कपट आहे, असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला आहे.

जरांगेंच्या विधानावर राऊत म्हणाले…

मला कधीही अटक होऊ शकते, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. यावरही राऊत बोलले. सरकार कुणालाही अटक करेल. कायद्याने अडवता येत नाही, म्हणून व्यक्तिगक हल्ले केले जातात. त्यांच्या समाजासाठी ते काम करत आहे. जरांगे सरकारला धोकादायक वाटतात. जे लोक यांना कायद्याने आवरता येत नाहीत. त्यांना हे अटक करण्याचं अस्त्र उगरतात, असं म्हणत राऊतांनी घणाघात केलाय.

प्रफुल्ल पटेल यांच्या आरोपांवर राऊतांनी प्रतिक्रिया दिलीय. राजकारण आम्हाला पण कळतं. शरद पवारसाहेब गेले का कुठे? पवारसाहेब पुरोगामी महाराष्ट्राचे नेते आहेत. शिंदे आणि अजित पवार यांचे आरोप ही भाजप स्क्रिप्ट आहे. असं राऊत म्हणालेत.

Follow Us
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य