AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐकावं ते नवलचं, चोरीला गेलेल्या रस्ताचा मास्टर माइंड शोधला जाणार, निर्णय काय ?

मालेगावमधील सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी रस्त्याची तक्रार करत रस्ता शोधून देणाऱ्याला लाखों रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यामुळे राज्यभर मालेगावच्या रस्त्याच्या चर्चा झाली होती.

ऐकावं ते नवलचं, चोरीला गेलेल्या रस्ताचा मास्टर माइंड शोधला जाणार, निर्णय काय ?
Image Credit source: Google
| Updated on: Feb 10, 2023 | 7:44 AM
Share

नाशिक : खेड्यापाड्यांत रस्ता करण्याची जबाबदारी ही जिल्हा परिषदेकडे ( Zilha Parishad ) असते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अंतर्गत रस्ते केले जातात. त्यानुसार अनेक ठिकाणी रस्ते ( Street Road ) होतात पण काही ठिकाणी रस्ते होत नसतांना बीलं काढली जातात. त्यामुळे गावागावातील राजकारण जिल्हा परिषदेपर्यन्त येऊन ठेपले आहे. त्यानुसार नाशिक ( Nashik News ) जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्याकडे याबाबत तक्रारी येऊ लागल्या आहेत. बांधकाम विभागाने याबाबत चौकशी सुरू केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि इगतपुरी या दोन तालुक्यात दोन गावं सध्या जिल्हा परिषदेत चर्चेचा विषय ठरत आहे. गावातील दोन गटात असलेलं राजकारण जिल्हा परिषदेत पोहचले आहे.

काही दिवसांपूर्वी मालेगाव तालुक्यातील टोकडे गावात रस्ता चोरीला गेला आहे. शोधून देणाऱ्याला बक्षीस दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार चर्चेत आला होता.

मालेगावमधील सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी रस्त्याची तक्रार करत रस्ता शोधून देणाऱ्याला लाखों रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यामुळे राज्यभर मालेगावच्या रस्त्याच्या चर्चा झाली होती.

गावात रस्ताच झालेला नसतांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेला रस्ता प्रत्यक्षात नाही, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचाही त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणाची थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल घेतली आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रस्त्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

मालेगावची घटना ताजी असतांना इगतपुरी तालुक्यातील एक तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामध्ये इगतपुरीच्या कुऱ्हेगावातही रस्ता चोरीला गेला आहे.

त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चौकशी होत असतांना आता बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे. म्हणजेच राज्याच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी होणार आहे.

त्यामुळे खरंच रस्ता चोरीला गेला आहे का ? रस्ता चोरणारा व्यक्ती कोण आहे? रस्ता चोरणाऱ्याच्या प्रकरणात कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे याचा शोध लागणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

बांधकाम विभागाच्या अभियंता पदावर नव्याने रुजू झालेले संदीप सोनवणे यांनी याबाबत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपअभियंता यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात या चौकशीतून काय समोर येणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.