AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अधिकाऱ्यांची बदली झाली पण ‘पॅटर्न’ नाही सोडला; लातूर पॅटर्नची नाशिकमध्ये होतेय जोरदार चर्चा, कारण काय?

नाशिक जिल्ह्यातील शाळांमध्ये अचानक लातूर पॅटर्नची चर्चा होऊ लागली आहे. त्यानिमित्ताने शासनाच्या शालेय पोषण आहार ह्या योजनेची सुद्धा चर्चा होऊ लागली आहे.

अधिकाऱ्यांची बदली झाली पण 'पॅटर्न' नाही सोडला; लातूर पॅटर्नची नाशिकमध्ये होतेय जोरदार चर्चा, कारण काय?
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Feb 08, 2023 | 2:21 PM
Share

नाशिक : शासन सेवेत ( Maharashtra Goverment ) मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांची बदली होत असते. त्यानिमित्ताने या शहरातून त्या शहरात जाणे अधिकाऱ्यांना क्रमप्राप्त असते. त्यामुळे दर दोन-तीन वर्षांनी अधिकाऱ्यांच्या ( Zp Officer ) कामाचे ठिकाण बदलतं. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यामध्ये नाशिकच्या ( Nashik News ) जिल्हा परिषदेत प्राथमिक विभागात भगवान फुलारी या अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. यापूर्वी ते लातूर येथे होते. प्राथमिक शिक्षण विभागात भगवान फुलारी यांनी लातूरमध्ये जे काम केलं तेच काम इथंही सुरू केलंय. मात्र, पूर्वीच्या अधिकाऱ्यांपेक्षा फुलारी यांनी केलेलं काम अधिक चर्चेत आले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये फुलारी यांच्या लातूर पॅटर्नची ( Latur Patern ) चर्चा होऊ लागली आहे.

डिसेंबर महिन्यात नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात भगवान फुलारी या अधिकाऱ्यांची बदली झालीय. पदभार स्वीकारताच त्यांनी लातूर पॅटर्नची अंमलबजावणी नाशिकमध्येही सुरू केली आहे.

खरंतर भगवान फुलारी हे काही नवं काम करत नाही. शासनाची असलेल्या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे अंमलात आणत आहे. 1995 पासूनची शालेय पोषण आहाराची योजना या निमित्ताने चर्चेत आली आहे.

भगवान फुलारी यांनी नाशिकमध्ये पदभार स्वीकारताच सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व प्राथमिक शाळांना सूचना दिल्या होत्या, त्यामध्ये पदभार स्वीकारल्यानंतर फुलारी यांनी दुसऱ्या आठवड्यातच अंमलबजावणी सुरू केली होती.

नाशिक जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय आणि अनुदानित शाळांना शालेय पोषण आहाराच्याबाबतीत सूचना दिल्या आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेत काटेकोरपने आठवड्यातील दोन दिवस फळे वाटप होत आहे.

पोषण आहारात जो निधी येतो त्यापैकी जो निधी अतिरिक्त आहारासाठी असतो त्यामध्ये प्रत्येक मुलाला ऋतुमानानुसार फळ वाटप होत आहे. अचानक झालेला हा बदल पाहून अनेक शाळांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यापूर्वीही योजना होती मात्र अंमलबजावणीचा अभाव असावा त्यामुळे विद्यार्थ्यांना लाभ मिळत नव्हता. मात्र, अचानक शाळेत फळं वाटप होऊ लागल्याने विद्यार्थ्यांना हा बदल शाळेची गोडी निर्माण करण्यासाठी पुरेसा आहे.

फुलारी यांनी सध्याच्या वातावरणानुसार केळी वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहे. शासनाच्या उद्दिष्टे जी आहेत त्यात फुलारी यांचा लातूर पटर्न यशस्वी होत आहे.

शिक्षणाबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, शाळेत विद्यार्थ्यांनी येऊन शिक्षण घ्यावे, शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबावी यासाठी शासनाची शालेय पोषण आहार योजना आहे.

Follow Us
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं...
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं प्रकरण काय?
शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; राऊतांचा स्फोटक हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; संजय राऊतांचा स्फोटक हल्लाबोल!
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान?
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान? भाजपच्या बड्या नेत्याने काढला चिमटा
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड...
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड चर्चा; नेमकं काय घडलं?
आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? पवारांच्या आंदोलनातून इशारा!
Rohit Pawar Protest | आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? रोहित पवारांच्या आंदोलनातून सरकारला मोठा इशारा!
क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, सिरसे गावात.....
Nashik | क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, झाडे पडली, सिरसे गावात हाहाकार
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द