AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Earthquake : दिंडोरी तालुक्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के, 4 दिवसानंतर पुन्हा धक्के बसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण

रविवारी रात्रीच्या सुमारास दिंडोरी शहरात भूकंपाचे दोन धक्के जाणवले. 10 वाजून 6 मिनिटांनी पहिला, तर 10 वाजून 15 मिनिटांनी दुसरा धक्का बसला.

Nashik Earthquake : दिंडोरी तालुक्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के, 4 दिवसानंतर पुन्हा धक्के बसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण
दिंडोरी तालुक्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Aug 22, 2022 | 5:37 PM
Share

नाशिक : दिंडोरी (Dindori) तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी साधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने (Administration) केले आहे. मेरी येथील भूकंप मापक केंद्रात नोंद (Earthquake Center) झाली. 2.1 आणि 2.5 रिश्टर स्केलची नोंद झाली. काल रात्री 10 वाजेच्या सुमारास दोन धक्के जाणवले. मेरी येथील केंद्रापासून 24 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र आहे. गेल्या आठ दिवसांत दुसऱ्यांदा दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के लागले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने ही माहिती दिली. या घटनेत काहीही नुकसान नाही. नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

रात्री झोपण्याच्या वेळी सौम्य धक्के

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास दिंडोरी शहरात भूकंपाचे दोन धक्के जाणवले. 10 वाजून 6 मिनिटांनी पहिला, तर 10 वाजून 15 मिनिटांनी दुसरा धक्का बसला. नागरिक झोपण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात हा धक्का बसल्यानं नागरिक घराबाहेर पडले. जमिनीला हादरे बसल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले. यापूर्वी आलेल्या धक्क्यात जांबुटके गावात मोठे हादरे बसले होते. नाशिक जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे धक्के बसले. हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं होतं. याच परिसरात रविवारी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवलेत. पेठ, सुरगाणा आदी भागात जुलै महिन्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर दिंडोरीतही भूकंपाचे धक्के जाणवले.

नागरिकांनी घाबरू नये

चार-पाच दिवसांत दुसरा धक्का बसल्यानं नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. परंतु, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर आणि तहसीलदार पंकज पवार यांनी केले आहे. चार दिवसांपूर्वी मेरी भूकंप मापक केंद्रात 3.4 रिश्टर तीव्रतेची नोंद झाली. नाशिक शहरातपासून 17 किलोमीटरवर भूकंपाचे धक्के जाणवले होते. दिंडोरी तालुक्यातील निळवंडी, तळेगााव, उमराळे, मंडकीबांब या भागात 16 ऑगस्टच्या रात्री मोठा आवाज आला होता.

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल