AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्रीपदी प्रमोशन मिळावं असं वाटत नाही का? असं विचारताच अजितदादा म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकमधील दिवसभरातील कार्यक्रम आटोपून आणि जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. (ajit pawar)

मुख्यमंत्रीपदी प्रमोशन मिळावं असं वाटत नाही का? असं विचारताच अजितदादा म्हणाले...
ajit pawar
| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 5:55 PM
Share

नाशिक: उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकमधील दिवसभरातील कार्यक्रम आटोपून आणि जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणून प्रमोशन व्हावं असं वाटत नाही का? असा प्रश्न अजितदादांना विचारण्यात आला. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता ‘नाही वाटत’ असं उत्तर त्यांनी दिलं. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि पाच वर्षे तेच मुख्यमंत्री राहतील, असंही अजितदादांनी स्पष्ट केलं. (i don’t want promotion as a chief minister, says ajit pawar)

अजित पवार यांनी नाशिक जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. कोरोना परिस्थिती ते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याचवेळी त्यांना एका पत्रकाराने वेगळा प्रश्न विचारला. प्रत्येकाला बढती आणि प्रमोशनची अपेक्षा असते. तुम्हालाही उपमुख्यमंत्री राहून कंटाळा आला असेल. प्रमोशन व्हावं, मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का? असा सवाल अजितदादांना करण्यात आला. अनपेक्षितपणे आलेला हा प्रश्न अजितदादांनी तितक्याच सहजतेने टोलवून लावला. मला प्रमोशन व्हावं असं नाही वाटत, असं त्यांनी बिनदिक्कतपणे सांगितलं. बरं हे सांगतानाच आपल्या विधानाचं समर्थन करणारं उदाहरणही दिलं. तुम्हीही पत्रकार आहात. तुम्हालाही आपण संपादक व्हावं वाटतं. पण सर्वचजण संपादक होत नाही. एकच व्यक्ती संपादक होत असतो. आमच्याकडेही 145 मध्ये एकच माणूस मुख्यमंत्री होतो. तो आम्ही बसवलेला आहे. तोही पाच वर्षासाठी बसवला आहे. त्यामुळे पाच वर्षे याचा विचारच करायचा नाही, असं अजितदादांनी सांगताच एकच हशा पिकला.

पाच वर्षे सरकार टिकणार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेऊन उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपद दिलं आहे. हे तीन नेते सांगतील तोपर्यंत सरकार चालणार आहे. शरद पवारांनी पाच वर्षे सरकार टिकणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनीही पाच वर्षे सरकार टिकावं अशी सोनिया गांधीची इच्छा असल्याचं स्पष्ट केलं आहे. परंतु, मधून मधून सरकारमध्ये अस्वस्थता असल्याच्या वावड्या उठवल्या जातात. बातम्या सोडल्या जातात. त्या बिनबुडाच्या असतात. त्यात काही तथ्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हा ज्याचा त्याचा प्रश्न

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडी सारख्या संस्था आहेत, हे पूर्वी कुणाला माहीत नव्हतं. ही यंत्रणा देशातील सर्वच राज्यात आहेत. कोणी काय तक्रार करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असं ते म्हणाले. (i don’t want promotion as a chief minister, says ajit pawar)

संबंधित बातम्या:

VIDEO: देशमुखांनंतर नागपुरचा दुसरा बडा नेता ईडीच्या रडारवर; राऊतांविरोधात ईडीकडे तक्रार

पडळकर म्हणाले, रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात, आता रोहित पवारांचं जशास तसं उत्तर

शिवसेना-राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा, नाईलाजाने काँग्रेसही स्वबळावर मैदानात!

(i don’t want promotion as a chief minister, says ajit pawar)

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....