दहीहंडी साजरी करणारच, आम्ही अस्वल, आमच्यावर खूप केस; संदीप देशपांडे आक्रमक

चंदन पुजाधिकारी

| Edited By: |

Updated on: Aug 27, 2021 | 11:50 AM

जन आशीर्वाद यात्रा आणि आंदोलनावेळी कोरोना नसतो का? असा सवाल करतानाच आम्ही दहीहंडी साजरी करणारच, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं. (mns leader sandeep deshpande insist on celebrating Dahi Handi in Mumbai)

दहीहंडी साजरी करणारच, आम्ही अस्वल, आमच्यावर खूप केस; संदीप देशपांडे आक्रमक
sandeep deshpande

नाशिक: जन आशीर्वाद यात्रा आणि आंदोलनावेळी कोरोना नसतो का? असा सवाल करतानाच आम्ही दहीहंडी साजरी करणारच, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं. आम्ही अस्वल आहोत, आमच्यावर खूप केस आहे, असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला. (mns leader sandeep deshpande insist on celebrating Dahi Handi in Mumbai)

संदीप देशपांडे यांनी मीडियाशी बोलताना हे स्पष्ट केलं. आम्ही दहीहंडी साजरी करणारच आहोत. आंदोलनावेळी आणि जन आशीर्वाद यात्रेवेळी कोरोना नसतो का? हिंदू आणि मराठी सणांनाच बंदी का? कोरोनाची तिसरी लाट येणार याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? तुम्हाला वाटलं की तिसरी लाट येणार आहे का?, असा सवाल देशपांडे यांनी केला. आमच्यावर कितीही केसेस टाका. आम्ही अस्वल आहोत. आमच्यावर खूप केस आहेत, असंही ते म्हणाले.

धनुर्विद्या केंद्रावरून टीका

मुंबईच्या दादरमधील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र बंद आहे. तिथला बाण महापौर बंगल्यात गेल्यामुळे केंद्र बंद केलं आहे. तुमची निशाणी बाण आहे त्याच तरी भान ठेवा, नाही तर तुधमची निशाणी घड्याळ किंवा हात करा, असा टोला लगावतानाच प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

शाखाध्यक्ष पक्षाचा कणा

यावेळी मनसेचे नेते अमित ठाकरे यांनीही मीडियाशी संवाद साधला. एकाच ठिकाणी सगळ्यांना भेटणं अवघड होतं. अनेकांना शाखाध्यक्ष होण्याची इच्छा आहे. त्यामुळे तीन ठिकाणी बैठक घेतली आहे. शाखा अध्यक्ष हा पक्षाचा कणा आहे. राज ठाकरे सगळीकडे जाऊ शकत नाही म्हणून शाखा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे प्रभाग अध्यक्ष हे पद ठेवण्यात आलेलं नाही. शाखाधक्ष महत्वाचा आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.

कोणतंही सरकार कायम नसतं

तुम्ही आम्हाला सांगितलं महिन्यातून येत जा म्हणून आम्ही तयारीला लागलोय. आम्ही आमचे काम करत राहणार. कोणतंही सरकार कायम नसतं. लोक बघत असतात कोण काम करतंय आणि कोण नाही. लोक सुज्ञ असतात, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

सत्तेत आल्यावर सगळं करू

मुंबई, पुणे, नाशिक सगळीकडे बैठक होत आहे. लोकांना कळलं की मनसेने किती काम केले आणि आमचे काम किती मेंटेन केले. नाशिकमध्ये पाण्याचा प्रश्न मनसेने सोडवला. मुंबईमध्ये खेळ खेळायला गार्डन देखील कमी आहेत. सत्तेत आल्यावर सगळं करू, असं त्यांनी सांगितलं. (mns leader sandeep deshpande insist on celebrating Dahi Handi in Mumbai)

संबंधित बातम्या:

भाजपशी कधीच कटुता येणार नाही, आम्ही हिंदुत्वाच्या बंधनात; संजय राऊतांचं मोठं विधान

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना ईडीचा धक्का, लोणावळा, जळगावातील संपत्ती जप्त

भाजपमधील घुसखोरांनी माहौल बिघडवला, भाजपला शुद्धीकरणाची गरज; संजय राऊतांचा टोला

(mns leader sandeep deshpande insist on celebrating Dahi Handi in Mumbai)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI