AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने 32 हजार 172 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू…

नाशिक जिल्ह्यातील प्रमुख त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झालीयं. दारणा, गंगापूर आणि पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालीयं.

Nashik | नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने 32 हजार 172 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू...
| Edited By: | Updated on: Aug 17, 2022 | 10:58 AM
Share

लासलगाव : नाशिक (Nashik) जिल्हात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा संततधार पावसाला सुरूवात झालीयं. यामुळे धरणातील पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. गंगापूर धरणातून काल पाण्याचा विसर्ग करण्यात आलायं. नाशिक जिल्हातील जवळपास सर्वच धरणे ओव्हर फ्लो (Over flow) झाली असून धरणातून पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. यामुळे जिल्हातील नद्यांना पुरस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून (Administration) नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलायं. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात संततधार पाऊस सुरूयं.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात संततधार पाऊस सुरू

नाशिक जिल्ह्यातील प्रमुख त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झालीयं. दारणा, गंगापूर आणि पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालीयं. कारण दारणा, गंगापूर आणि पालखेड धरणातून जो पाण्याचा विसर्ग केला जातोयं, तो मधमेश्वर धरणामध्ये होतो आहे.

नांदूर मधमेश्वर धरणातून 61 टीएमसी 40 लक्ष घनफूट पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले

नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीनदी पत्रातून 32 हजार 172 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येते आहे. आज सकाळी 6 वाजेपर्यंत या पावसाच्या हंगामात नांदूर मधमेश्वर धरणातून 61 टीएमसी 40 लक्ष घनफूट पाणी गोदावरी नदीतून सोडण्यात आले. यामुळे आता जाकवाडी धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून जायकवाडी धरणाते तीन दरवाजे उघडल्याची माहिती मिळतंय. यंदाच्या जोरदार पावसामुळे पाणीटंचाईची समस्या दूर होणार हे नक्की आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.