AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली पोलिसांची नाशिकमध्ये पुन्हा कारवाई; पिस्तुल, काडतूस विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या

फरीदाबादचा टेकचंद दालचंद खेरी आणि हरियाणाचा द्याचंद जयपाल डिलर यांचा दिल्लीत पिस्तुल आणि काडतूस विक्रीचा धंदा. त्यांनी चांगलाच जम बसवला होता. काही काळ सुरळीत चालले. मात्र, त्यांच्यावर पोलिसांची नजर पडलीच. हा ससेमिरा चुकवण्यासाठी त्यांनी थेट नाशिक गाठले होते. भूमाफिया पीयूष तिवारी आणि हे शस्त्रास्त्र विक्रेते इतर कोण-कोणत्या गुन्ह्यात सहभागी आहेत का, याचा छडाही पोलीस आता लावणार आहेत.

दिल्ली पोलिसांची नाशिकमध्ये पुन्हा कारवाई; पिस्तुल, काडतूस विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या
प्रातिनिधिक छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Mar 28, 2022 | 4:45 PM
Share

नाशिकः दिल्ली पोलिसांनी (Police) नाशिकमध्ये (Nashik) पुन्हा एक कारवाई करत पिस्तुल आणि काडतूस विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. दोनच दिवसांपू्र्वी दिल्लीत हजारो कोटींचा घोटाळा करून नाशिकमध्ये दडून बसलेल्या ठकसेनाला पोलिसांनी चतुर्भुज केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा दिल्ली (Delhi) पोलिसांनी ही कारवाई केलीय. त्याचे झाले असे की, टेकचंद दालचंद खेरी (वय 30) आणि द्याचंद जयपाल डिलर (वय 25) हे दोन तरुण दिल्लीत पिस्तूल आणि काडतुसांची विक्री करायचे. मात्र, ते पोलिसांच्या रडारवर आले होते. हे पाहता त्यांनी दिल्लीतून धूम ठोकली आणि लपण्यासाठी थेट नाशिक गाठले. मात्र, इथेही त्यांच्या मागे पोलीस टपकले आणि त्यांना अलगद उचलले. या कारवाईमुळे दिल्ली पोलिसांच्या कर्तबगारीचेही कौतुक होत आहे. दिल्ली पोलीस एखाद्याच्या मागे हात धुवून लागले की, ते त्याला अटक करेपर्यंत सोडत नाहीत, हेच यातून समोर येतेय.

मित्राच्या मदतीने रहायचे

फरीदाबादचा टेकचंद दालचंद खेरी आणि हरियाणाचा द्याचंद जयपाल डिलर यांचा दिल्लीत पिस्तुल आणि काडतूस विक्रीचा धंदा. त्यांनी चांगलाच जम बसवला होता. काही काळ सुरळीत चालले. मात्र, त्यांच्यावर पोलिसांची नजर पडलीच. हा ससेमिरा चुकवण्यासाठी त्यांनी थेट नाशिक गाठले. येथे मित्राच्या मदतीने ते रहात होते, पण शस्त्र विकणारे संशयित नाशिकला लपून बसल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली. त्यांनी नाशिक येथे येऊन या संशयितांना अटक केली.

दोन दिवसांपूर्वी भूमाफियाला बेड्या

दोनच दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन एका भूमाफियाला बेड्या ठोकल्या आहेत. पीयूष तिवारी असे त्याचे नाव आहे. तिवारीने दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये जमीन खरेदी-विक्रीच्या माध्यमातून तब्बल एक हजार कोटींचा घोटाळा केला आहे. त्याच्यावर या तीन राज्यांमध्ये जवळपास 37 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या शोधासाठी गेल्या 6 महिन्यांपासून दिल्ली पोलिसांनी रात्रीचा दिवस केला होता. तिवारीच्या अटकेवर 50 हजारांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. अखेर त्याला पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन उचलले.

इतर प्रकरणांचाही शोध सुरू

भूमाफिया पीयूष तिवारी आणि हे शस्त्रास्त्र विक्रेते इतर कोण-कोणत्या गुन्ह्यात सहभागी आहेत का, याचा छडाही पोलीस आता लावणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे नाशिकमध्ये रहात होते. याचा सुगावा पोलिसांना लागताच त्यांनी ही कारवाई केली. याबद्दल दिल्ली पोलिसांचे कौतुक होत आहे. उशिराने का होईना सराईत गुन्हेगार ताब्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त होतेय.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.