AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये फेसबुकवर झालेल्या भांडणातून खून; जिल्हा न्यायालयाकडून तिघांना जन्मठेप

सोशल मीडियावर झालेल्या भांडणातून खून होण्याचा हा प्रकार सात वर्षांपू्र्वीचा आहे. आता परिस्थिती अजून जास्त बदललीय. सोशल मीडियातील पोस्टवरून दंगे पेटण्यापासून ते ठेचून मारण्यापर्यंतचे प्रकार घडतायत. हे पाहता आपण सोशल मीडियावर स्वतःचे वर्तन योग्य ठेवले, तिथे वावराचा अतिरेक टाळला तर बरेच काही टाळता येऊ शकते. खरे तर समाजमाध्यमांवर कसे व्यक्त व्हावे, याचे धडे देण्याची गरज आता निर्माण झालीय.

नाशिकमध्ये फेसबुकवर झालेल्या भांडणातून खून; जिल्हा न्यायालयाकडून तिघांना जन्मठेप
प्रातिनिधिक छायाचित्र.
मनोज कुलकर्णी
मनोज कुलकर्णी | Updated on: Apr 09, 2022 | 1:17 PM
Share

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) फेसबुकवर (Facebook) झालेल्या भांडणातून पुन्हा भांडण उकरून काढून केलेल्या खुनाप्रकरणी (Murder) जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना जन्मठेप आणि प्रत्येक दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. योगेश जाधव, सुमित दिंडोरकर आणि राजरत्न नखाडे अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, 11 मे 2015 रोजी पाथर्डी फाटा परिसरातील मुरलीधरनगर येथे एक खून झाला होता. त्यात आरोपींनी तुषार उर्फ बंटी अनिल तायडे आणि आनंद संजय खणके याच्यावर फेसबुकवर झालेल्या भांडणातून वाद घालत हल्ला केला होता. या घटनेत एकाचा मृत्यू झाला होता. या खुनाने एकच खळबळ माजली होती. विशेषतः सोशल मीडियातील भांडणावरून प्रत्यक्षात खून पडल्यामुळे याची धास्तीही अनेकांनी घेतली होती. याप्रकरणाचा निकाल आता सात वर्षांनंतर आला आहे. यातून इतरांनी आणि विशेषतः सोशल मीडियातील कारणावरून भांडण करणाऱ्यांनी बोध घेण्याची गरज व्यक्त होतेय.

चाकूने केले वार

आरोपींचे तुषार अनिल तायडे आणि आनंद संजय खणके यांच्याशी फेसबुकवर भांडण झाले होते. या वादाची कुरापत त्यांनी पुन्हा हे दोघे भेटताच काढली. वादावादीचे पर्यवसन हाणामारीपर्यंत पोहचले. आरोपींनी चाकूने वार करत गंभीर दुखापत केली. याप्रकरणात मृताच्या भावाच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यात तिन्ही आरोपींना न्यायाधीश मृदुला व्ही. भाटीया यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यावेळी सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता दीपशिखा भिडे यांनी युक्तीवाद केला, त पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक एस. एस. गायकवाड, एस. यू. गोसावी यांनी काम पाहिले.

अतिरेक टाळला तर…

सोशल मीडियावर झालेल्या भांडणातून खून होण्याचा हा प्रकार सात वर्षांपू्र्वीचा आहे. आता परिस्थिती अजून जास्त बदललीय. सोशल मीडियातील पोस्टवरून दंगे पेटण्यापासून ते ठेचून मारण्यापर्यंतचे प्रकार घडतायत. हे पाहता आपण अफवांवर विश्वास नाही ठेवला आणि सोशल मीडियावर स्वतःचे वर्तन योग्य ठेवले, तिथे वावराचा अतिरेक टाळला तर बरेच काही टाळता येऊ शकते. खरे तर समाजमाध्यमांवर कसे व्यक्त व्हावे, याचे धडे देण्याची गरज आता निर्माण झालीय. इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Follow Us
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत