AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये फेसबुकवर झालेल्या भांडणातून खून; जिल्हा न्यायालयाकडून तिघांना जन्मठेप

सोशल मीडियावर झालेल्या भांडणातून खून होण्याचा हा प्रकार सात वर्षांपू्र्वीचा आहे. आता परिस्थिती अजून जास्त बदललीय. सोशल मीडियातील पोस्टवरून दंगे पेटण्यापासून ते ठेचून मारण्यापर्यंतचे प्रकार घडतायत. हे पाहता आपण सोशल मीडियावर स्वतःचे वर्तन योग्य ठेवले, तिथे वावराचा अतिरेक टाळला तर बरेच काही टाळता येऊ शकते. खरे तर समाजमाध्यमांवर कसे व्यक्त व्हावे, याचे धडे देण्याची गरज आता निर्माण झालीय.

नाशिकमध्ये फेसबुकवर झालेल्या भांडणातून खून; जिल्हा न्यायालयाकडून तिघांना जन्मठेप
प्रातिनिधिक छायाचित्र.
मनोज कुलकर्णी
मनोज कुलकर्णी | Updated on: Apr 09, 2022 | 1:17 PM
Share

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) फेसबुकवर (Facebook) झालेल्या भांडणातून पुन्हा भांडण उकरून काढून केलेल्या खुनाप्रकरणी (Murder) जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना जन्मठेप आणि प्रत्येक दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. योगेश जाधव, सुमित दिंडोरकर आणि राजरत्न नखाडे अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, 11 मे 2015 रोजी पाथर्डी फाटा परिसरातील मुरलीधरनगर येथे एक खून झाला होता. त्यात आरोपींनी तुषार उर्फ बंटी अनिल तायडे आणि आनंद संजय खणके याच्यावर फेसबुकवर झालेल्या भांडणातून वाद घालत हल्ला केला होता. या घटनेत एकाचा मृत्यू झाला होता. या खुनाने एकच खळबळ माजली होती. विशेषतः सोशल मीडियातील भांडणावरून प्रत्यक्षात खून पडल्यामुळे याची धास्तीही अनेकांनी घेतली होती. याप्रकरणाचा निकाल आता सात वर्षांनंतर आला आहे. यातून इतरांनी आणि विशेषतः सोशल मीडियातील कारणावरून भांडण करणाऱ्यांनी बोध घेण्याची गरज व्यक्त होतेय.

चाकूने केले वार

आरोपींचे तुषार अनिल तायडे आणि आनंद संजय खणके यांच्याशी फेसबुकवर भांडण झाले होते. या वादाची कुरापत त्यांनी पुन्हा हे दोघे भेटताच काढली. वादावादीचे पर्यवसन हाणामारीपर्यंत पोहचले. आरोपींनी चाकूने वार करत गंभीर दुखापत केली. याप्रकरणात मृताच्या भावाच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यात तिन्ही आरोपींना न्यायाधीश मृदुला व्ही. भाटीया यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यावेळी सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता दीपशिखा भिडे यांनी युक्तीवाद केला, त पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक एस. एस. गायकवाड, एस. यू. गोसावी यांनी काम पाहिले.

अतिरेक टाळला तर…

सोशल मीडियावर झालेल्या भांडणातून खून होण्याचा हा प्रकार सात वर्षांपू्र्वीचा आहे. आता परिस्थिती अजून जास्त बदललीय. सोशल मीडियातील पोस्टवरून दंगे पेटण्यापासून ते ठेचून मारण्यापर्यंतचे प्रकार घडतायत. हे पाहता आपण अफवांवर विश्वास नाही ठेवला आणि सोशल मीडियावर स्वतःचे वर्तन योग्य ठेवले, तिथे वावराचा अतिरेक टाळला तर बरेच काही टाळता येऊ शकते. खरे तर समाजमाध्यमांवर कसे व्यक्त व्हावे, याचे धडे देण्याची गरज आता निर्माण झालीय. इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली