AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात शेतकरी आत्महत्या होतायेत, पण कृषीमंत्री सध्या…; संभाजीराजे धनंजय मुंडेंवर बरसले

Sambhajiraje Chhatrapati on Dhananjay Munde : शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरून छत्रपती संभाजीराजे यांचा धनंजय मुंडेंवर घणाघात; म्हणाले... राज्यात शेतकरी आत्महत्या होतायेत, पण कृषीमंत्री सध्या... पाहा नेमकं काय म्हणाले

राज्यात शेतकरी आत्महत्या होतायेत, पण कृषीमंत्री सध्या...; संभाजीराजे धनंजय मुंडेंवर बरसले
| Updated on: Sep 11, 2023 | 12:36 PM
Share

नाशिक | 11 सप्टेंबर 2023 : स्वराज्य संघटनेचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी शेतकरी आत्महत्येबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. बीड जिल्ह्यात आणि राज्यातच शेतकरी आत्महत्या होत आहेत. कृषी धोरण ब्रिटिशांनी केलेलं आहे, त्यात बदल झालेला नाही. लाँग टर्म पॉलिसी यायला हवी. कृषी मंत्री सध्या उत्तर सभा घेण्यात बिझी आहे. जे काही राजकारणात चालू आहे, त्यात लोकांना इंटरेस्ट नाही. लोकांची कामं होणं गरजेचं आहे. शेतकरी आत्महत्या रोखणं सध्याचं आव्हान आहे, असं संभाजीराजे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आता आणखी तीव्र झालं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यावर संभाजीराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आज सर्वपक्षीय बैठक आहे. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला होता. मराठा समाजासाठी या बैठकीला मी उपस्थित राहील. सरकारने सर्व पक्षीय नेत्यांना बोलवलं, याचं कौतुक आहे. भावना आणि न्यायिक भूमिका यांचा समन्वय साधला जाईल, अशी अपेक्षा आहे, असं ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा समाज आहे. इतके दिवस गरीब मराठा समाजाला बाहेर का ठेवलं? मी संसद आवारात जाऊन आंदोलन केलं. राणे समितीने आरक्षण दिलं, पण ते टिकलं नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात देखील आरक्षण टिकलं नाही. या सरकारने दीड वर्षात भूमिका घेतली नाही, हे दुर्दैवी आहे. मी मागच्या सरकारला आणि या सरकारला देखील जाब विचारणार आहे, असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला सरकरट कुणबी प्रमाण पत्र देण्यात यावं, असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने तीन वेळा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मात्र मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. मागण्या मान्य होत नाहीत. तोवर मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. त्यामुळे आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.