मोठी बातमी! निदा खानच्या सुनावणीदरम्यान भगवान श्रीकृष्णाचा दाखला, कोर्टात काय घडलं?

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाशिक येथील निदा खान प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरु असताना कोर्टात न्यायालयाने भगवान श्रीकृष्णाचा दाखला दिला आहे.

मोठी बातमी! निदा खानच्या सुनावणीदरम्यान भगवान श्रीकृष्णाचा दाखला, कोर्टात काय घडलं?
Nida Khan
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 10, 2026 | 11:21 AM

गेल्या काही दिवसांपासून नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनी धर्मांतर आणि महिलांवरील अत्याचार प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला पोलिसांनी अटक केली. पण निदा खान गर्भवती असल्याने कोर्टाने तिला जामीन मंजूर केला. कोर्टाचा हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक होता. पण तिची जामीन अर्ज स्वीकारताना स्थानिक कोर्टाने म्हटले की, तुरुंगात मुलाला जन्म देण्याची वेदना कोणत्याही महिलेसाठी असह्य असते.

कोर्टाने या संदर्भात भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उल्लेखही केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश (नाशिक रोड) के. जी. जोशी यांनी म्हटले की, टीसीएस प्रकरणातील चौकशीत प्रथमदर्शनी असे दिसते की, निदा खानने इतर सहआरोपींसोबत मिळून पीडितेला मानसिकदृष्ट्या प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. तिची विचारसरणी आणि धर्म बदलण्याचा प्रयत्न केला.

गर्भावस्थेमुळे जामीन मंजूर

लैंगिक छळ आणि धर्मांतरणाशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीचा उल्लेख करताना न्यायाधीश म्हणाले की, आरोपींनी पीडितेला हिंदू धर्म ठीक नाही असे म्हणत तिचा विश्वास संपादन केला. सुमारे दोन महिन्यापूर्वी अटक झालेल्या निदा खानला ६ जुलै रोजी कोर्टाने जामीन दिला होता. या संबंधातील विस्तृत आदेश गुरुवारी उपलब्ध झाला. न्यायाधीशांनी आदेशात म्हटले की, एफआयआरमध्ये खान यांची भूमिका स्पष्टपणे उल्लेखित आहे.

75 हजर रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर

निदा पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात घेऊन कोर्टाने तिचा जामीन अर्ज स्वीकारला आहे. न्यायाधीश म्हणाले, “आरोपी गर्भवती आहे. याशिवाय या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे आणि चार्जशीटही दाखल झाली आहे. अशा परिस्थितीत तिला न्यायिक हवालात ठेवण्याचे कोणतेही औचित्य नाही.”

नाशिकमधील घटनेनंतर निदा खान अटकेच्या भीतीने फरार झाली होती. या काळात तिने पोलिसांना चकवा देण्यासाठी सातत्याने आपली ठिकाणे बदलत राहिली. यानंतर तपासातून काही महत्त्वाची माहिती समोर आली. त्यानुसार, निदा खानने सर्वात आधी ठाणे गाठले, त्यानंतर काही दिवस तिने भिवंडीत आश्रय घेतला. यानंतर तिने मुंबई आणि सोलापूरमधील आपल्या नातेवाईकांकडे मुक्काम ठोकला. निदा खानने मालेगावमध्ये स्थानिक स्तरावर मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. पण तिथे तिचे प्रयत्न अपयशी ठरले. आता तिला या प्रकरणात जामीन मंजुर झाला आहे.

Follow Us