AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

17 तारखेच्या महामोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही; संजय राऊत यांचा इशारा

शनिवारी निघणाऱ्या मोर्चाला कार्यकर्ते नक्कीच येतील. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा हा विषय आहे. अस्मितेचा विषय आहे. महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत आहे.

17 तारखेच्या महामोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही; संजय राऊत यांचा इशारा
17 तारखेच्या महामोर्चाला सरकार थांबवू शकणार नाहीImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 15, 2022 | 10:14 AM
Share

नाशिक: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप नेते प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा आणि सुधांशु त्रिवेदी यांच्याकडून झालेल्या महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ शनिवारी 17 डिसेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीने या मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाला अद्याप परवानगी मिळाली नाही. त्यामुळे मोर्चा निघणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोर्चा निघणार असल्याचा दावा केला आहे. 17 तारखेचा मोर्चा सरकार थांबवू शकणार नाही, असा इशाराच संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना दिला आहे.

मोर्चाला परवानगी मिळेल. देशात लोकशाही आहे. देशात अधिकृत हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही. लोकशाहीत लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनाला कुणी आडकाठी आणू शकत नाही. राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढत आहे. तो एक प्रकारचा मोर्चाच आहे. त्यामुळे आमचाही मोर्चा निघेल, असं संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात अनेक विषय गंभीर आहे. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले या आमच्या दैवतांचा अपमान घटनात्मक पदावर बसलेला व्यक्ती खुलेआम करत आहे. त्याचं समर्थन सरकार करत आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे. आम्ही मोर्चा काढू नये असं सरकारला वाटत होतं तर मग राज्यपालांना हटवायला हवं होतं. राष्ट्रीय प्रवक्त्यांवर कारवाई करायला हवी होती. का केली नाही? असा सवाल त्यांनी केला.

आम्ही मोर्चा काढणारच आहोत. 17 तारखेच्या आमच्या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही, असं सांगतानाच सीमाभागात तणाव आहे. त्यामुळे आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही. आम्ही अनेक प्रश्नांवर मोर्चा काढून महाराष्ट्राचा आवाज केंद्रापर्यंत पोहोचवू. हा फक्त शिवसेनेचा मोर्चा नाही. हा जनतेचा मोर्चा आहे. आम्ही फक्त नेतृत्व करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शनिवारी निघणाऱ्या मोर्चाला कार्यकर्ते नक्कीच येतील. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा हा विषय आहे. अस्मितेचा विषय आहे. महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत आहे. सरकार तोंडाला कुलूप लावून बसलं आहे. पण जनता तोंडाला कुलूप लावून बसलेली नाही. जनता बोलेल. जनता 17 तारखेला घोषणा देईल, गर्जना करेल. या गर्जना दिल्लीच्या तख्तापर्यंत जाईल, असा दावाही त्यांनी केला.

मोर्चा किती मैल चालला यापेक्षा मोर्चाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येणार आहेत. निषेध व्यक्त करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुलेंबद्दल श्रद्धा व्यक्त करणार आहेत, हेच महत्त्वाचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन