AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदी यांची नाशकात सभा, काँग्रेसवर प्रचंड प्रहार, नाशिकच्या जनतेला उद्देशून काय म्हणाले?

"काँग्रेस आपल्या पायांवर उभी राहू शकत नाही. त्यामुळे काँग्रेसने राजकारणात स्वत:ला वाचवण्यासाठी स्वत:चं सर्वात मोठं हत्यार उपसलं आहे. ते हत्यार म्हणजे एससी, एसटी आणि ओबीसींची एकात्मता तोडा आणि राज्य हिसकवा", असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

नरेंद्र मोदी यांची नाशकात सभा, काँग्रेसवर प्रचंड प्रहार, नाशिकच्या जनतेला उद्देशून काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 08, 2024 | 3:51 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सभा पार पडली. या सभेत त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर प्रचंड टीका केली. यावेळी त्यांनी नाशिककरांना देखील महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं आवाहन केलं. “जेव्हा नीती स्पष्ट असते, नियत स्वच्छ असते तेव्हा त्याचे चांगले परिणाम दिसतात. नाशिकचे माझे बंधू-बघिणी हे चांगले परिणाम पाहत आहेत. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भार भारताची ताकद बनत आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची पर्वा आहे, ना कोर्टाची, ना देशाच्या भावनेची पर्वा आहे. ते फक्त देखाव्यासाठी खिशात खाली पानांचे संविधान घेऊन फिरतात”, असा टोला मोदींनी लगावला.

“काल तुम्ही पाहिलं असेल. पोलखोल झाली. जेव्हा संविधानाच्या सन्माचा विषय येतो तेव्हा ते उलट पळतात. हे काँग्रेसवाले असे आहेत की, त्यांनी 75 वर्षांपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला लागू होऊ दिलं नाही. 75 वर्षांपर्यंत देशात एक संविधान नव्हतं. जम्मू-काश्मीरचं संविधान वेगळं होतं. ते बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान नव्हतं. ते पाप काँग्रेसचं होतं. काँग्रेसने कलम 370 सारखी भिंत उभी केली होती. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान तिथे जाऊच शकत नव्हतं”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

‘काँग्रेसवाल्यांचे कान फुटतील इतक्या जोराने सांगा…’

“भाजपप्रणित एनडीएने कलम 370 हटवलं आणि एक देश, एक संविधान लागू केलं. माझी बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात मोठी श्रद्धांजली आहे. जेव्हा भारताचं संविधान जम्मू-काश्मीरमध्ये पूर्ण देशात आनंद साजरा केला जात होतो. मी माझ्या नाशिकच्या लोकांना विचारु इच्छुतो, काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्याने तुम्हाला आनंद झाला की नाही? या काँग्रेसवाल्यांचे कान फुटतील इतक्या जोराने सांगा तुम्हाला आनंद झाला की नाही?”, असं नाशिककरांना उद्देशून नरेंद्र मोदी म्हणाले.

‘त्यांच्या पोटात उंदिर धावायला लागले’

“आपल्याला आनंद झाला पण काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पोटात उंदिर धावायला लागले. त्यांना दुखायला लागलं. दोन-तीन दिवसाआधी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू करण्यासाठी हंगामा केला. या लोकांना पुन्हा बाबासाहेबांचं संविधान जम्मू-काश्मीरमधून काढायचं आहे. संविधानाच्या विरोधात दलित, मागास, आदिवासींच्या विरोधात काँग्रेस आहे, तितकेच आघाडीचे त्यांचे सहकारी देखील आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

‘काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांची खोटे बोलण्याची दुकान’

“निवडणुकीच्या वेळी पक्ष आपल्या कामकाजांचा हिशोब देवून जनतेत जाते. भाजप आणि महायुतीदेखील लगातार आपल्या कामांचा हिशोब देत आहे. पण भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेसकडे एकच पद्धत आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांची खोटे बोलण्याची दुकान आहे. काँग्रेस आणि त्यांच्या चेल्यांनी महाराष्ट्रात हे दुकान सुरु केलं आहे. काँग्रेसने कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचलमध्येदेखील असेच खोटे दुकान सुरु केले होते. पण परिणाम काय झाले, निवडणुका संपल्या आणि दुकानेच शटर लागले”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

‘खर्चासाठी जनतेचे टॅक्स वाढवले’

“दिलेली आश्वासने पूर्ण करणं तर दूर काँग्रेसशासित राज्यात सरकार चलवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत. खर्चासाठी जनतेचे टॅक्स वाढवले जात आहेत. जनतेकडून वसुली होत आहे. जनतेला देखील यांचं खरं रुप माहिती समजली आहे. महाराष्ट्राची जनता हे जाणून आहे. एकीकडे महायुतीचं घोषणापत्र दुसरीकडे आघाडीचं घोटाळापत्र. कारण जिथे काँग्रेस आणि त्यांचे सहकारी असतील तिथे घोटाळा होणार म्हणजे होणार”, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

‘काँग्रेसने स्वत:ला वाचवण्यासाठी सर्वात मोठं हत्यार उपसलं’

“हे लोक अशा योजनांची घोषणा करतात ज्याच्यात जास्तीत जास्त घोटाळा होईल. आपण या लोकांना हे पाप करु देणार का? ही फसवणूक महाराष्ट्राच्या जनतेला चालेल का? संपूर्ण देशाने काँग्रेसला घरचा रस्ता दाखवला आहे. काँग्रेस आता राष्ट्रीय राहिलेली नाही. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड अशा अनेक राज्यांत काँग्रेस दुसऱ्या पक्षांसोबत निवडणूक लढवत आहे. काँग्रेस आपल्या पायांवर उभी राहू शकत नाही. त्यामुळे काँग्रेसने राजकारणात स्वत:ला वाचवण्यासाठी स्वत:चं सर्वात मोठं हत्यार उपसलं आहे. ते हत्यार म्हणजे एससी, एसटी आणि ओबीसींची एकात्मता तोडा आणि राज्य हिसकवा”, असादेखील आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

Follow Us
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?