AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीच एक व्यथा आहे… शरद पवार यांची काँग्रेसबाबतची नेमकी व्यथा काय?; पहिल्यांदाच असं का म्हणाले?

आमच्याकडे संख्या नाही. आम्ही क्रमांक एकचा पक्ष असतो तर सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काही निर्णय घेतले असते. आमच्याकडे आज शक्ती नाही. संख्या नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणं योग्य नाही.

तीच एक व्यथा आहे... शरद पवार यांची काँग्रेसबाबतची नेमकी व्यथा काय?; पहिल्यांदाच असं का म्हणाले?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 11, 2023 | 9:56 AM
Share

नाशिक: नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर ठाकरे सरकार कोसळलं नसतं, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांच्या या विधानाशी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि यशोमती ठाकूर यांनीही सहमती दर्शवली आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन घोडचूक केलीय का? अशी चर्चा रंगली आहे. ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. मात्र, हे भाष्य करताना त्यांनी काँग्रेसबाबतची एक व्यथाही बोलून दाखवली आहे.

शरद पवार नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नाशिकमधील पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पवार यांना नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी कशाला शिळ्या कढीला ऊत आणता असं म्हणत या विषयाला पूर्णविराम दिला.

तो विषय संपला

तो मुद्दा होऊन गेला. एक वर्ष झालं. नाना पटोले यांनी राजीनामा दिला. त्यानंतर नवे विधानसभा अध्यक्ष आले. आता त्यावर चर्चा करून शिळ्या कढीला कशाला ऊत आणायचा? पटोले अध्यक्ष झाले. ते सर्वांच्या पाठिंब्याने झाले. त्यानंतर जेव्हा आपण वेगळा निर्णय घेतो, तेव्हा ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचा विचार घ्यायचा असतो. एवढीच व्यथा आहे. पण तो विषय संपला आहे, असं शरद पवार म्हणाले.

निवडणुकीची प्रक्रिया सुरू

राष्ट्रवादीत फेरबदल होणार आहे काय? असा सवालही शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर आमच्याकडे निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण होईल तेव्हा ठरवू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

संख्या नाही, शक्ती नाही

राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचं आहे. कामलाा लागा, असे आदेश पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्याबाबतही पवार यांना विचारण्यात आले. कुणाला काही आवडेल. पण संख्या असली पाहिजे.

आमच्याकडे संख्या नाही. आम्ही क्रमांक एकचा पक्ष असतो तर सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काही निर्णय घेतले असते. आमच्याकडे आज शक्ती नाही. संख्या नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणं योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं.

नाना पटोले काय म्हणाले?

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काल त्यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत विचारण्यात आले. त्यावर त्यांनी हा माझ्या एकट्याचा निर्णय नव्हता असं स्पष्ट केलं. मला विधानसभा अध्यक्ष करण्याचा निर्णय आमच्या नेत्या सोनिया गांधी यांचा होता.

तसेच मी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा हा निर्णयही सोनिया गांधी यांचाच होता. मी फक्त कार्यकर्ता म्हणून त्या आदेशाचं पालन केलं, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं होतं.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.