AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Burning Bus : नाशिक-औरंगाबाद मार्गावर शिवशाही पेटली; काळ आला होता, पण…!

नाशिक-औरंगाबाद (Nashik-Aurangabad) राज्य मार्गावर शिवशाही बसला (bus) आग (fire) लागल्याची घटना घडली आहे. निफाड तालुक्यातील बोकडदरे येथे ही घटना घडली. औरंगाबाद येथून ही गाडी नाशिककडे जात होती.

The Burning Bus : नाशिक-औरंगाबाद मार्गावर शिवशाही पेटली; काळ आला होता, पण...!
येवला तालुक्यातल्या देशमाने येथे शिवशाही जळून खाक झाली.
| Edited By: | Updated on: Apr 26, 2022 | 1:02 PM
Share

नाशिकः नाशिक-औरंगाबाद (Nashik-Aurangabad) राज्य मार्गावर शिवशाही बसला (bus) आग (fire) लागल्याची घटना घडली आहे. निफाड तालुक्यातील बोकडदरे येथे ही घटना घडली. औरंगाबाद येथून ही गाडी नाशिककडे जात होती. मात्र, येवला तालुक्यातल्या देशमाने येथे ही गाडी अचानक बिघडली. बसमधून जवळपास दहा ते पंधरा प्रवासी प्रवास करत होते. मात्र, बस बंद पडल्याने त्यांना दुसऱ्या बसमध्ये बसवून देण्यात आले होते. त्यानंतर बिघडलेल्या बसने पेट घेतला. आगीचे कारण सध्या स्पष्ट नसले, तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीचा अधिक तपास निफाड पोलिस करत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीही राज्यभरात अनेकदा शिवशाही बसला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, त्यानंतरही या घटनांचे चक्र सुरूच आहे. जर शिवशाही सदोष असतील, तर त्यांच्यामध्ये दुरुस्ती का केली जात नाही, असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे.

महिन्यात दुसरी घटना

गेल्याच महिन्यात सांगलीहून पुण्याला जाणाऱ्या शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर चालकाने ही बस रस्त्याच्या कडेला उभी केली. बसमधील प्रवाशांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्या. अग्निशमन दलाच्या दोन गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. या बसमध्येही जवळपास 40 प्रवासी होते. हे सारे प्रवासी गाडीचे चालक शेरअली सिराज फकीर यांनी प्रसंगावधान दाखवल्याने बचावले. त्यानंतरही पुन्हा लगेच नाशिक जिल्ह्यात शिवशाहीला आग लागल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

कधी होणार दोषमुक्त?

शिवशाही आग लागण्याच्या घटना जुन्याच आहेत. शिवशाही बसमध्ये काही दोष असतील आणि त्रुटी असतील तर त्या तात्काळ दूर कराव्यात. अन्यथा हे प्रवाशांच्या जीवाशी खेळणे होणार आहे. प्रत्येक वेळी आग लागलेली समजेल, असे नसते. एखाद्या वेळेस धोका होऊ शकतो. त्यावेळी प्रवाशांच्या जीवावर बेतल्यानंतर एसटी प्रशासन जागे होणार आहे का, असा सवाल यानिमित्ताने करण्यात येत आहे.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.