AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांची नारायण राणेंवर सडकून टीका; म्हणाले, बिनडोक लोक…

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकेर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राणेंनी शंकराचार्यांवर केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत ठाकरेंनी नाशिकमधील सभेत सडकून टीका केली.

उद्धव ठाकरे यांची नारायण राणेंवर सडकून टीका; म्हणाले, बिनडोक लोक...
UddhavThackeray Narayan rane
| Updated on: Jan 23, 2024 | 8:11 PM
Share

नाशिक :ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील सभेमध्ये सत्ताधाऱ्यांवर आसुड ओढलं आहे. हिंदू धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरु शंकाराचार्य यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नसल्याचं म्हटलं होतं. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकाराचार्यांनी हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान सांगावं असं म्हणत निशाणा साधला होता. याचाच धागा पकडत उद्धव ठाकरेंनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंच राणेंवर निशाणा

काही बिनडोक लोकं तर शंकराचार्याचं योगदान काय विचारत आहेत. सनातन धर्मावर बोलल्यास तुमची तळपायाची आग मस्तकात जाते. तुम्ही सनातन धर्माला मानता की नाही. तुमच्या पक्षात बाजारबुणगे भरले आहेत. भ्रष्टाचारी घोटाळेबाज तुम्ही घेतली. भाजपमध्ये आज भ्रष्टाचाऱ्यांना मान आहे. पण शंकराचार्यांना आहे की नाही. मग मोदींचं राजकारण हा काही नवीन धर्म काढता. तुम्ही भ्रष्टाचारांशी बोलता, हुडी घालून बोलता. लपून छपून भेटता. प्रफुल्ल पटेलसोबत फोटो येत आहे. ज्याने मिर्चीबरोबर व्यवहार केला. देशद्रोही इक्बाल मिर्चीबरोबर व्यवहार केला म्हणून बोंबलणारे तुम्हीच होता असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कारसेवकांना सर्वांच्या वतीने वंदन करतोय. काल काळाराम मंदिरात गेलो. सावरकरांच्या जन्मभूमीत गेलो. अयोध्या ही श्रीरामचंद्राची जन्मभूमी आहे. पंचवटी ही पराक्रम भूमी आहे. आता जे मंदिर आहे. तिथे पर्णकुटी होती. तिथे राम सीता लक्ष्मण राहिले होते. शृपर्णखेचं नाक आणि कान इथेच कापलं आहे. त्यानंतर 14 हजार राक्षस रामाला मारायला आले होते. आता जे भव्यदिव्य स्वरुप आहे. तसं रामचंद्राने अतिभव्य काल स्वरुप धारण करून राक्षसाचा वध केला होता. कालस्वरुप म्हणजे काळाराम. तो माझ्यासमोर बसला आहे. आम्ही रामम मंदिराला विरोध करतो असं नाही. कारण तो अस्मितेचा प्रश्न आहे. काल मला शिवसेनाप्रमुखांची आठवण आल्याचं ठाकरे यानी म्हटलं आहे.

राजकारण्यांची एक सीमा असते. त्यांच्यावर काही बंधनं असतात. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात विधीचं पालन विधिवत व्हायला हवं. प्रत्येक क्षेत्रात हस्तक्षेप केल्यास तो राजनेत्याचा उन्माद मानला जातो, असं शंकराचार्य यांनी म्हटलं होतं.

Follow Us
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.