AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांची नारायण राणेंवर सडकून टीका; म्हणाले, बिनडोक लोक…

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकेर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राणेंनी शंकराचार्यांवर केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत ठाकरेंनी नाशिकमधील सभेत सडकून टीका केली.

उद्धव ठाकरे यांची नारायण राणेंवर सडकून टीका; म्हणाले, बिनडोक लोक...
UddhavThackeray Narayan rane
| Updated on: Jan 23, 2024 | 8:11 PM
Share

नाशिक :ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील सभेमध्ये सत्ताधाऱ्यांवर आसुड ओढलं आहे. हिंदू धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरु शंकाराचार्य यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नसल्याचं म्हटलं होतं. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकाराचार्यांनी हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान सांगावं असं म्हणत निशाणा साधला होता. याचाच धागा पकडत उद्धव ठाकरेंनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंच राणेंवर निशाणा

काही बिनडोक लोकं तर शंकराचार्याचं योगदान काय विचारत आहेत. सनातन धर्मावर बोलल्यास तुमची तळपायाची आग मस्तकात जाते. तुम्ही सनातन धर्माला मानता की नाही. तुमच्या पक्षात बाजारबुणगे भरले आहेत. भ्रष्टाचारी घोटाळेबाज तुम्ही घेतली. भाजपमध्ये आज भ्रष्टाचाऱ्यांना मान आहे. पण शंकराचार्यांना आहे की नाही. मग मोदींचं राजकारण हा काही नवीन धर्म काढता. तुम्ही भ्रष्टाचारांशी बोलता, हुडी घालून बोलता. लपून छपून भेटता. प्रफुल्ल पटेलसोबत फोटो येत आहे. ज्याने मिर्चीबरोबर व्यवहार केला. देशद्रोही इक्बाल मिर्चीबरोबर व्यवहार केला म्हणून बोंबलणारे तुम्हीच होता असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कारसेवकांना सर्वांच्या वतीने वंदन करतोय. काल काळाराम मंदिरात गेलो. सावरकरांच्या जन्मभूमीत गेलो. अयोध्या ही श्रीरामचंद्राची जन्मभूमी आहे. पंचवटी ही पराक्रम भूमी आहे. आता जे मंदिर आहे. तिथे पर्णकुटी होती. तिथे राम सीता लक्ष्मण राहिले होते. शृपर्णखेचं नाक आणि कान इथेच कापलं आहे. त्यानंतर 14 हजार राक्षस रामाला मारायला आले होते. आता जे भव्यदिव्य स्वरुप आहे. तसं रामचंद्राने अतिभव्य काल स्वरुप धारण करून राक्षसाचा वध केला होता. कालस्वरुप म्हणजे काळाराम. तो माझ्यासमोर बसला आहे. आम्ही रामम मंदिराला विरोध करतो असं नाही. कारण तो अस्मितेचा प्रश्न आहे. काल मला शिवसेनाप्रमुखांची आठवण आल्याचं ठाकरे यानी म्हटलं आहे.

राजकारण्यांची एक सीमा असते. त्यांच्यावर काही बंधनं असतात. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात विधीचं पालन विधिवत व्हायला हवं. प्रत्येक क्षेत्रात हस्तक्षेप केल्यास तो राजनेत्याचा उन्माद मानला जातो, असं शंकराचार्य यांनी म्हटलं होतं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.