AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाच्या शिधाला उशीर का? बाळासाहेब थोरातांनी सांगितलं कारण

त्यामुळे नेत्यांचे फोटो कदाचित गंभीर असतील.

आनंदाच्या शिधाला उशीर का? बाळासाहेब थोरातांनी सांगितलं कारण
बाळासाहेब थोरात म्हणतात...Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Oct 19, 2022 | 7:20 PM
Share

नाशिक : राज्य सरकारनं आनंदाची शिधा शंभर रुपयांत देण्याची घोषणा केली. काही ठिकाणी आनंदाची शिधा पोहचली. पण, काही ठिकाणी अद्याप आनंदाची शिधा पोहचली नाही. याला उशीर का होतोय, यावर बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले, 100 रुपये किलो देणारे किटवर नेत्यांचे फोटो चांगले छापले नाहीत म्हणून उशीर होत आहे. गंभीर असलेले नेत्यांचे फोटो किटवर लावण्यात आले होते. त्यामुळं आता किमान दिवाळीनंतर नागरिकांना किट मिळेल, अशी अपेक्षा करूया, असंही ते म्हणाले. सरकार सध्या टेंशनमध्येच आहे. त्यामुळे नेत्यांचे फोटो कदाचित गंभीर असतील. हे काय वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही, अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेस अंतर्गत अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. त्यांचा अनुभव मोठा आहे. गेल्या 50 वर्षापासून ते संसदीय कामकाजात आहेत. केंद्रीय मंत्री आणि विरोधीपक्ष नेते म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. एक अनुभवी नेता काँग्रेस पक्षाला अध्यक्ष म्हणून मिळाले आहेत, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

मतदानामध्ये गडबड झाली आहे असे जे आरोप होत आहेत ते चुकीचे आहेत. अत्यंत खुल्या वातावरणात मतदान झाले आहे. सोनिया गांधी यांनी अतिशय कठीण काळात काम केले आहे. आता देखील काळ कठीण आहे. मात्र खरगे यांच्यावर काम करतील, असा विश्वास आहे.

राहुल गांधी हेदेखील सध्या भारत जोडो यात्रा करत आहेत. सोनिया गांधी यांचे मार्गदर्शन राहील. मात्र काम अध्यक्षांना करावे लागणार आहे. खरगे साहेब उत्तम मराठी बोलतात. आपल्यासाठी ते चांगलं आहे. येणारा 2024 वर्ष आमच्यासाठी खूप यश देणारे असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बाळासाहेब थोरात म्हणाले, भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला होणे हे दुर्दैवी घटना आहे. घरावर हल्ला करणं हे लोकांना रुचणार नाही. मागच्या काही दिवसापासून जे राजकारण सुरू आहे ते महाराष्ट्राला रूचणारं नाही.

सध्या तरी पाणीटंचाई नाही. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी परिस्थिती आहे. सगळे पीक खराब झाले आहेत. तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावे ही आमची मागणी आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हंटलं.

शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी खूप खराब जात आहे. अजून पंचनामे नाही तर भरपाई कुठून देणार आहेत. फक्त घोषणा करून चालणार नाही.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.