AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: अँटीजेन टेस्ट केली तरच नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये प्रवेश

पाचही मार्केटमध्ये होत असलेली गर्दी कमी होताना दिसत नाही. | Navi Mumbai Coronavirus

मोठी बातमी: अँटीजेन टेस्ट केली तरच नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये प्रवेश
नो अँटीजेन टेस्ट, नो एंट्री
| Updated on: Apr 01, 2021 | 3:53 PM
Share

नवी मुंबई: नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत अँटीजेन टेस्ट केल्याशिवाय कोणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई परिसरातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असून एपीएमसी मार्केटमधील (APMC Market) संचालक,सचिव आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली आहे. तर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तरी पाचही मार्केटमध्ये होत असलेली गर्दी कमी होताना दिसत नाही. काही व्यापारी, कर्मचारी आणि ग्राहक मास्क वापरत नसल्याचे समोर आले होते. (Navi Mumbai APMC Market Coronavirus Restrictions)

त्यामुळे मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये प्रशासनाच्यावतीने नो अँटीजेन टेस्ट, नो एंट्री सुरु करण्यात आली आहे. एपीएमसी प्रशासनाच्या वतीने सॅनिटायजिंग करणे, मास्क वापरणे बंधनकारक, आणि सामाजिक अंतर पाळणे यासाठी विविध उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. तर बाजार आवाराशी संबंधित सर्व घटकांना 7 एप्रिल पर्यंत अँटीजेन टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

बाजार समितीतील संबंधित घटकांनी अँटीजेन टेस्ट केली नसल्यास त्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाने घेतला आहे. तर मास्क न वापरणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम तीनशे ऐवजी पाचशे करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रयन्त करत असून सध्या केलेल्या उपाययोजनांमुळे आम्हाला मदत होईल. तर बाजार आवारातील सर्व घटकांनी एपीएमसी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सभापती अशोक डक यांनी केले.

अडीच महिन्यांत 18 हजार जणांवर कारवाई

नवी मुंबईत शासन आणि महापालिका प्रशासन यांनी जे मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यावर पोलीस प्रशासनाकडून लोकांचे प्रबोधन करून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. अडीच महिन्यात नियम मोडणाऱ्या 18000 जणांवर कारवाई करून दंड आकारण्यात आला आहे.

तर काही जणांवर गुन्हे दाखल केले गेले आहेत. कोरोना महामारीच्या मार्गदर्शक नियमांचे पालन झाल्यास शहरातील कोरोना संख्या आटोक्यात राहील. एपीएमसी मार्केट प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्याने सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ करण्यात आली आहे. 20 ते 25 कर्मचाऱ्यांचे पथक मार्केटमध्ये कार्यरत करण्यात आले आहे. तर रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास एपीएमसी प्रशासन, महापालिका आणि पोलीस यांच्यामध्ये चर्चा करून आणखी काही निर्बंध वाढवण्याबाबत विचार केला जाईल, असे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

EXCLUSIVE : Maharashtra second Lockdown : तूर्तास लॉकडाऊन नाही, पण वाटचाल त्याच दिशेने : राजेश टोपे

(Navi Mumbai APMC Market Coronavirus Restrictions)

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.