AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पर्यटनस्थळावर जाऊ नका, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन

सध्या पावसाचा पॅटर्न बदलला आहे. पूर्वी एका महिन्यात एवढा पाऊस पडायचा. आता एक ते दोन दिवसात पाऊस पडतोय. त्यामुळे आव्हान वाढलं आहे. अशा प्रकारचे धोकादायक स्पॉट शोधून कार्यवाही करण्यात येणार आहे.

पर्यटनस्थळावर जाऊ नका, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन
cm eknath shinde Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 20, 2023 | 11:19 AM
Share

खालापूर | 20 जुलै 2023  : खालापूर येथील इर्शाळगडाजवळील इर्शाळवाडीत दरड कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अजूनही ढिगाऱ्याखाली 171 जण अडकले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. गेल्या तीन दिवसापासून रायगड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे हा हाहा:कार उडाला आहे. राज्यभरात पावसाने कहर केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

खालापूर येथील दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेची माहिती घेतली. त्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केलं. जे वाचले त्यांना धीर दिला आणि जखमींची विचारपूस केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखाची मदत देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. तसेच जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

घराबाहेर पडू नका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी नागरिकांना आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. विनाकारण घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं. तसेच टुरिस्ट साईटवर जाऊ नका, असं आवाहनही केलं आहे. शाळांना सुट्टी देण्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. परिस्थिती पाहून ते निर्णय घेतील, अशी माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेल्पलाईन नंबर

810819555

पावसाचा पॅटर्न बदलला

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सध्या पावसाचा पॅटर्न बदलला आहे. पूर्वी एका महिन्यात एवढा पाऊस पडायचा. आता एक ते दोन दिवसात पाऊस पडतोय. त्यामुळे आव्हान वाढलं आहे. अशा प्रकारचे धोकादायक स्पॉट शोधून कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोन करून घटनेची माहिती घेतली आणि मदतीचं आश्वासन दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

आदिती तटकरे रुग्णालयात

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. आज सकाळीच त्या रुग्णालयात गेल्या. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासन करणार आहे. रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील अजून जखमी नागरिक रुग्णालयात आल्यास प्रशासनाने सज्ज असावे याबाबत त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली.

यावेळी एमजीएम चे डॉ. सागर, पनवेल महापालिकेचे डॉ. गोसावी नायब तहसीलदार पनवेल लाचके उपस्थित होते. या दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबांना शासन पाच लाखांची मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. इथे सुरू असलेल्या बचाव कार्यावर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री स्वतः लक्ष देऊन आहेत. या दुर्घटनाग्रस्त घटनास्थळी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेत सुदैवाने बचावलेल्या ग्रामस्थांशी दानवे यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला.

Follow Us
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...