AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री म्हणजेच व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र; जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका

कोट्यवधी रुपयांच्या घोषणा केल्या जात आहेत मात्र पैसा आहे तरी कुठे? बोलायला तरी पैसे कुठे लागतात? मुंबई ही सर्वांची आहे. मुंबई ही सर्वांची पोसणारी आई आहे.

मुख्यमंत्री म्हणजेच व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र; जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका
मुख्यमंत्री म्हणजेच व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र; जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 05, 2023 | 7:01 AM
Share

नवी मुंबई: ठाण्यामध्ये टिपून टिपून मारताहेत. मुख्यमंत्र्यांना असे वाटते की अख्खं ठाणे माझ्या हातात असावं. शरद पवार यांनी एवढं वर्ष राजकारण पण त्यांच्या बारामतीत असं कधी झालं नाही, असं सांगतानाचत्यांना साथ दिली नाही तर कुणाचं हॉटेल तोडून टाकलं, कुणाचं घर तोडून टाकलं. म्हणजे ते मुख्यमंत्री नाहीत तर व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र आहेत, अशी टीका राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

नवी मुंबईत आगरी कोळी महोत्सावाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्याला संबोधित करताना जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. आजकाल अंगावर जाण्याची भीती वाटते. कधी रात्री उचलून निघून घेऊन जातील याचा काय अंदाज नाही. गुन्हा कोणताही असो तोही सांगता येणार नाही. माझ्या आयुष्यात पहिल्या 72 तासांत दोन गुन्हे दाखल झाले, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

सरकार म्हणजे कहर आहे. ज्या पद्धतीने सरकार वागतं. ती पद्धत कौतुकास्पद आहे. हम करो से कायदा ठीक आहे. थोडे दिवस हुकूमशाहीही लोक सहन करतील. हे लोक काय घडवून आणतील याचाही अंदाज सांगता येत नाही. लोकशाहीवर आता विश्वासच नाहीये, असं ते म्हणाले.

एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना तीनचा वार्ड असावा असे नक्की झाले होते. त्यावर 1500 कोटी खर्च झाला. आता म्हणतात चारचा वार्ड करा. आपल्या खिशातून कुठे जाणार आहेत पैसे? परत 1500 कोटी जाणार, असं ते म्हणाले.

कोट्यवधी रुपयांच्या घोषणा केल्या जात आहेत मात्र पैसा आहे तरी कुठे? बोलायला तरी पैसे कुठे लागतात? मुंबई ही सर्वांची आहे. मुंबई ही सर्वांची पोसणारी आई आहे. ही आई पोसणारी आहे म्हणून मुंबईकडे लोक येतात. पण या मुंबईचा तुकडा पडण्याच्या काम सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

नितेश राणेंच्या आरोपांवर मी काही बोलणार नाही. मी औरंगजेब क्रूर नव्हता असं मी म्हटलं नव्हतं. मी एका मंदिरासंदर्भात बोललो होतो आणि मी ज्या मंदिरा संदर्भात बोललो त्या संदर्भातले पुरावे लवकरच देईल, असं त्यांनी जाहीर केलं.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...