AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण, जवळपास 50 टक्के माल पडून

मुंबई APMC भाजीपाला बाजारातील भाज्यांचे दर वाटाणा 24 ते 40, फ्लॉवर 10, भेंडी 20, गाजर 10, शिमला 20, फ्लावर 12, टोमॅटो 30, मिरची 20, कोबी 12, दुधी 10, वांगी 10, कारली 10 रुपये प्रतिकिलो तर कोथिंबीर 5 आणि मेथी 5 रुपये जुडी होती.

एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण, जवळपास 50 टक्के माल पडून
एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Dec 06, 2021 | 11:43 PM
Share

नवी मुंबई : अवकाळी पाऊस थांबला असला तरी या पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. भाज्या, फळे, धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतात पडून राहिलेला माल शेतकऱ्यांनी तोडणी करून पाठवल्याने आज मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमाल येऊन पडला आहे. नियमित सरासरी 600 गाडी आवक भाजीपाला बाजारात येतो. मात्र आज अंदाजे 800 गाडी आवक भाजीपाला बाजारात आला. परिणामी भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली.

भाजीपाला बाजारात 50 टक्के शेतमाल पडून

सकाळी 40 रुपये प्रति किलो विकला गेलेला वाटाणा दुपारपर्यंत 24 रुपये प्रतिकिलो दराने व्यापाऱ्यांना विकावा लागला. शिवाय इतर भाजीपाला 10 ते 20 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. भाजीपाला बाजारातील जवळपास 50 टक्के शेतमाल पडून असल्याने भाजीपाला खराब होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अवकाळी पावसाचा परिणाम आणखी काही दिवस राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर आणखी काही दिवस भाजीपाला दर स्थिर राहतील असे सांगण्यात येत आहे. पावसाने शेतमाल खराब होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून दर कमी मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

किरकोळ बाजारावर नियंत्रण नसल्याने अधिक दराने भाजीपाला विक्री

सध्या वाटण्याचा हंगाम सुरु असून मोठ्या प्रमाणात वाटाणा बाजारात येत आहे. मात्र, वाटण्याला चांगला दर मिळत नसल्याचे व्यापारी सांगतात. त्यामुळे इतर भाज्यांचे दर देखील कमी झाले आहेत. किरकोळ बाजारावर नियंत्रण नसल्याने त्या ठिकाणी भरमसाठ अधिक दराने भाजीपाल्याची विक्री होत आहे. मुंबई APMC भाजीपाला बाजारातील भाज्यांचे दर वाटाणा 24 ते 40, फ्लॉवर 10, भेंडी 20, गाजर 10, शिमला 20, फ्लावर 12, टोमॅटो 30, मिरची 20, कोबी 12, दुधी 10, वांगी 10, कारली 10 रुपये प्रतिकिलो तर कोथिंबीर 5 आणि मेथी 5 रुपये जुडी होती. (Falling prices of vegetables in APMC vegetable market)

इतर बातम्या

Jacqueline Fernandes : मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीनला पुन्हा समन्स, 8 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश

St worker strike : एसटीचा संप मिटता मिटेना, निलंबन आणि दगडफेकीने एसटी कर्मचारी हैराण

Follow Us
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश कावरे तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, या बैठकीत...
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही पक्षाला पाठ फिरवणार? व्हिडीओ समोर येताच मोठी खळबळ
प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरम् प्रकरणी नव्या वादाची शक्यता
प्रणिती शिंदे यांच्या सोलापूरमधील कार्यक्रमात वंदे मातरम् अपूर्ण गायल्याने नवा वाद
राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट...
Sanjay Raut | राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट म्हणाले...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातू...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन थेट...
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याने
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याचा संशयास्पद मृत्यु, नेमकं काय घडलं?
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर... पक्षाने दिली राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह? बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल...
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह! बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल... शिवसेनेच्या कोर्टातील निकालाआधीच मोठा बॉम्ब
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
कल्याणमध्ये ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता...
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता... बीडच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?