AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईत शाळेची बेल वाजणार, पालकांना मेसेज, काय काय करावं लागणार?

ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सुरु राहणार आहेत.(Navi Mumbai Private school Reopen) 

नवी मुंबईत शाळेची बेल वाजणार, पालकांना मेसेज, काय काय करावं लागणार?
school (फोटो प्रातनिधिक)
| Updated on: Feb 02, 2021 | 5:40 PM
Share

नवी मुंबई : येत्या सोमवारपासून नवी मुंबईतील शाळांची घंटा वाजणार आहे. नवी मुंबईतील काही खासगी शाळा येत्या 8 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सुरु राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता सर्व पूर्ववत होत असून अनेक ठिकाणच्या शाळा पुन्हा सुरु केल्या जात आहे. (Navi Mumbai Private school Reopen)

काही दिवसांपूर्वी पनवेल महानगरपालिकाने इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग असलेल्या सर्व माध्यमांच्या शाळा सुरु करण्यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं होतं. त्यानुसार महापालिकेच्या सर्व शाळा गेल्या 27 जानेवारीपासून सुरु करण्यात आल्या होत्या. यानंतर आता इतर खासगी माध्यमांच्या शाळांनीही प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक खासगी शाळांनी याबाबत पालकांना मॅसेज पाठवत काही सूचना केल्या आहेत. एका सीबीएसई शाळेने पालकांना पाठवलेल्या मॅसेजनुसार, येत्या 8 फेब्रुवारीपासून शाळा सुरु करण्यात येत आहे. शाळांचा वेळ आणि टाईमटेबल काही दिवसांनंतर शेअर केले जाईल. विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा देण्यात येणार आहे. बस सुविधेचा लाभ घेण्यासाठी पालकांनी बसचा फॉर्म भरणे आवश्यक आहे.

पालकांसाठी सूचना 

सद्यस्थितीत 1 ते 23 हे हजेरी क्रम असलेले विद्यार्थी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहतील. त्याचदरम्यान 24 पासून पुढे हजेरी क्रमांक असलेले विद्यार्थी घरातून ऑनलाईनद्वारे शाळेत उपस्थित राहतील.

तर 24 पासून पुढे हजेरी क्रमांक असलेले विद्यार्थी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी प्रत्यक्ष शाळेत हजेरी लावतील. त्यादरम्यान 1 ते 23 हे हजेरी क्रम असलेले विद्यार्थी ऑनलाईनद्वारे शाळेत उपस्थित राहतील.

दरम्यान सर्व पालकांनी त्यांच्या पाल्याला शाळेत पाठवण्यासाठी दिलेल्या संमती फॉर्मची हार्डकॉपी शाळेत पाठवणे गरजेचे आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार नाही, असे यात नमूद करण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेकडून शाळांबाबत प्रसिद्धीपत्रक जारी

कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने राज्य सरकारने 5 वी ते 8 वी इयत्तेची शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाच्या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यातील शाळा उघडण्याबाबत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली असली तरी मुंबईतील शाळा पुढील आदेशापर्यंत सुरु होणार नाहीत, अशी माहिती मुंबई महापालिकेने प्रसिद्धी पत्रक जारी करत सांगितली आहे. (Navi Mumbai Private school Reopen)

संबंधित बातम्या : 

कोरोना लसीचा काहीच भरोसा नाही? लस घेतली तरी कोरोना झाला! नेमकं काय काय झालं?

ह्या बातमीचा महाराष्ट्राला अभिमान, लातुरात हळदी कुंकवाला तृतीय पंथी !

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं