AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी सूचक ट्विट, नंतर जाहीर आरोप, आता समीर वानखेडेंना डच्चू, ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यात मलिक यांना यश ?

मलिक यांच्या आरोपानंतर वानखेडे यांच्यावर संशयाने पाहिले जात असताना एनसबीने त्यांच्याकडून आर्यन खान ड्रग्ज प्रकरण तसेच इतर पाच केसेसचा तपास काढून घेतला आहे. वानखेडे यांच्याविरोधात करण्यात आलेली ही कारवाई म्हणजे मलिक यांना यश मिळाल्याचे म्हटले जात आहे.

आधी सूचक ट्विट, नंतर जाहीर आरोप, आता समीर वानखेडेंना डच्चू, 'करेक्ट कार्यक्रम' करण्यात मलिक यांना यश ?
मलिकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचा भाजपचा दावा
| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 8:46 PM
Share

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक हे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. या आरोपांनंतर वानखेडे अडचणीत सापडलेले असून एनसीबीने मोठा निर्णय घेतलाय. मलिक यांच्या आरोपानंतर वानखेडे यांच्यावर संशयाने पाहिले जात असताना एनसबीने त्यांच्याकडून आर्यन खान ड्रग्ज प्रकरण तसेच इतर पाच केसेसचा तपास काढून घेतला आहे. वानखेडे यांच्याविरोधात करण्यात आलेली ही कारवाई म्हणजे मलिक यांना यश मिळाल्याचे म्हटले जात आहे.

आर्यन खानला अटक म्हणजे बॉलिवूडला बदनाम करण्याचा कट

क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले. राज्यातील नशाखोरीचा नायनाट करणारा नायक म्हणून त्यांच्याकडे लोक पाहू लागले. त्यांनी केलेली धडाडीची कारवाई पाहून सगळेच प्रभावित झाले होते. मात्र या कारवाईनंतर मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गोष्टी उजेडात आणल्या. त्यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. मलिक यांनी सुरुवातील क्रूझ रेव्ह पार्टीवर एनसबीने केलेल्या कारावाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर त्यांनी आर्यन खानची अटक म्हणजे बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी रचण्यात आलेला कट असल्याचा आरोप केला.

नवाब मलिक यांच्याकडून आरोपांच्या फैरी

तसेच पुढे नवाब मलिक यांनी आपला मोर्चा थेट एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडे वळवला. मलिक रोज एक एक सूचक ट्विट करून वानखेडे यांच्यावर वेगवेगळे आरोप करत होते. त्यांनी वानखेडे यांनी आपला धर्म लपवून चुकीचे जात प्रमाणपत्र दावखून मागासवर्गीयांची नोकरी बळकावल्याचाही दावा केला. हा आरोप करताना त्यांनी वानखेडे यांची काही कथित कागदपत्रेदेखील सर्वजनिक केले. वानखेडे यांच्या या आरोपानंतर मात्र एनसीबीचे धाबे दणाणले. समीर वानखेडे यांच्याकडे नंतर संशयाने पाहिले जाऊ लागले. आर्यन खानची अटक म्हणजे दुसरा कट होता का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. तसेच वानखेडे यांनी खरंच चुकीची कागदपत्रे सादर केली का ? याचादेखील तपास व्हावा अशी मागणी केली जाऊ लागली.

मलिकांना यश, समीर वानखेडे यांना जबर धक्का

मलिक यांनी गंभीर आरोप केल्यानंतर एनसीबीच्या दिल्ली येथील मुख्यालयातून सूत्रे हालली. एनसीबीने वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू केली. त्यासाठी एनसीबीने एसआयटीची स्थापना केली. तर दुसरीकडे वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेबाबात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने अभ्यास करणे सुरु केले आहे. तसेच आता एनसीबीने वानखेडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग्ज प्रकरण तसेच इतर पाच प्रकरणांचा तपास काढून घेण्याचा निर्णय घेतला. एनसीबीचा हा निर्णय म्हणजे वानखेडे यांना मोठा धक्का तर दुसरीकडे मलिक यांना मिळालेले यश असल्याचे म्हटले जात आहे.

इतर बातम्या :

Aryan Khan drugs case | ”आरोप झाले मग त्या अधिकाऱ्याला बदलायचं हा वाईट मेसेज जाणार

आर्यन खान प्रकरणाचा तपास संजय सिंग यांच्याकडे, कोण आहेत संजय सिंग?

Aryan Khan drugs case | समीर वानखेडेंच्या ‘त्या’ 5 चुका, ज्यामुळे त्यांना आर्यन खान प्रकरणातून हटवलं; वाचा सविस्तर

(ncb officer sameer wankhede removed from aryan khan drug case probe nawab malik became successful)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.