AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“राज ठाकरेंनी पहाटे कामाला लागावं…” राष्ट्रवादीच्या आमदाराचा खोचक सल्ला, म्हणाले “स्वत:च्या सुपुत्राचा पराभव…”

काय झालं कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे. या मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे. फक्त आपल्यापर्यंत आलं नाही, असा शब्दात राज ठाकरेंनी टीका केली.

राज ठाकरेंनी पहाटे कामाला लागावं... राष्ट्रवादीच्या आमदाराचा खोचक सल्ला, म्हणाले स्वत:च्या सुपुत्राचा पराभव...
राज ठाकरे
| Updated on: Jan 30, 2025 | 6:14 PM
Share

Amol Mitkari On Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पदाधिकारी मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी प्रथमच विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले. यावेळी राज ठाकरेंनी प्रथमच निवडणुकांच्या निकालावर संशय व्यक्त केला. शरद पवार साहेबांचे ८ खासदार निवडून आले. त्यांचे १० आमदार येतात. आणि लोकसभेला अजित पवार यांचा एक खासदार आला. त्यांचे ४१ आमदार येतात. चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात? काय झालं कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे. या मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे. फक्त आपल्यापर्यंत आलं नाही, असा शब्दात राज ठाकरेंनी टीका केली. आता या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अमोल मिटकरी यांनी नुकतंच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांबद्दल मांडलेल्या भूमिकेवरुन टीका केली आहे. राज ठाकरेंनी अजित पवारांसारखं पहाटे ५ वाजल्यापासून कामाला लागलं पाहिजे, असा सल्ला अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना दिला.

अमोल मिटकरी काय म्हणाले?

“राज ठाकरेंना नेहमीच उशिरा उठून चिंतन करण्याची सवय आहे. त्यामुळे विधानसभेला स्वत:च्या घरात झालेल्या दारुण पराभवानंतर दीड महिन्यांनी ४२ जागा कशा आल्या हा शॉक त्यांना दीड महिन्यांनी बसलाय. मात्र आपल्या सुपुत्राचा दारुण पराभव का झाला आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत, यावर त्यांनी भाष्य करावं. यासाठी त्यांनी पहाटे ५ वाजल्यापासून कामाला लागलं पाहिजे”, असे अमोल मिटकरी म्हणाले.

राज ठाकरे आज काय म्हणाले? 

निवडणुकीचा निकाल लागल्यावर बरेच लोक भेटले. ज्या दिवशी निकाल लागला. मी बोलतो ते तुम्हाला समजत असेल. तुम्हाला माहीत आहे. महाराष्ट्रात निकाल लागल्यावर पहिल्यांदा सन्नाटा पसरला. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला हवा होता, मिरवणुका काय सगळं… सन्नाटा. कारण लोकांमध्येच संभ्रम होता. असा कसा निकाल लागला. भाजपला १३२ जागा मिळाल्या. त्याआधी १०६ होत्या. त्या आधी १२२ जागा होत्या. ठिक आहे, समजू शकतो. अजित पवार ४२ जागा. चार पाच जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार यांना ४२ जागा मिळतात. कुणाचा तरी विश्वास बसेल का. जे इतकी वर्ष राज्यात राजकारण करत आले. अजित पवार, भुजबळ ज्यांच्या जिवावर मोठे झाले त्या शरद पवार यांना १० जागा मिळतात. हे न समजण्याच्या पलिकडची गोष्ट आहे. ४ महिन्यापूर्वी लोकसभा झाली. सर्वात जास्त खासदार काँग्रेसचे आले. १३ खासदार आले. एका खासदाराखाली पाच ते सहा आमदार येतात. किती आमदार काँग्रेसचे यायला हवे होते. सहा ते सहा नाही पकडलं. तीन किंवा चार पकडले. त्यांचे १५ आमदार येतात. शरद पवार साहेबांचे ८ खासदार निवडून आले. त्यांचे १० आमदार येतात. आणि लोकसभेला अजित पवार यांचा एक खासदार आला. त्यांचे ४१ आमदार येतात. चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात? असा सवाल राज ठाकरेंनी केला.

काय झालं कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे. या मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे. फक्त आपल्यापर्यंत आलं नाही. तुम्ही कुठे मनात धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही. लोकांनी मतदान केलं. पण केलेलं मतदान कुठे तरी गायब झालं. अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या. अर्थात ही पण गोष्ट निघून जाईल. कोणी कोणत्या गोष्टीचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो. अशा गोष्टी होत असतात. पण मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे. महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत, असेही राज ठाकरे म्हणाले

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ