AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसे विचारावे प्रश्न ? नवीन आमदारांना पडला प्रश्न, ‘हा’ नेता म्हणाला आमच्यासोबत या तुम्हाला…

दोन वर्ष कोरोनामुळे वाया गेली. त्याचा परिणाम विधिमंडळाच्या कामकाजावरही दिसून आला. विधिमंडळाचे अधिवेशन दोन ते एक आठवडे इतकेच मर्यादित राहत होते.

कसे विचारावे प्रश्न ? नवीन आमदारांना पडला प्रश्न, 'हा' नेता म्हणाला आमच्यासोबत या तुम्हाला...
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Mar 06, 2023 | 2:53 PM
Share

मुंबई : राज्यात २०१९ मध्ये विधानसभेची निवडणुक झाली. शिवसेना आणि भाजपने युती म्हणून ही निवडणूक लढविली. पण, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली. मात्र, उद्धव ठाकरे यांना सत्तेचा फार काळ लाभ घेता आला नाही. राज्यात कोरोनाचे वारे वाहू लागले आणि पहाता पहाता कोरोनाने राज्याला विळखा घातला. दोन वर्ष कोरोनामुळे वाया गेली. त्याचा परिणाम विधिमंडळाच्या कामकाजावरही दिसून आला. विधिमंडळाचे अधिवेशन दोन ते एक आठवडे इतकेच मर्यादित राहत होते. कोरोना काळ संपून सर्व काही सुरळीत सुरु हात नाही तोच राज्यात सत्ताबदल झाला.

अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी मार्च २०२२ मध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यापाठोपाठ जून महिन्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणूक झाल्या. विधान परिषद निवडणूक झाली आणि त्याच रात्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले. भाजपच्यासोबत जात त्यांनी राज्यात पुन्हा शिवसेना आणि भाजपचे सरकार आणले. मात्र, या सगळ्या राजकीय बदलाचा परिणाम नवीन आमदारांच्या कामकाजावर झाला.

कोरोनामुळे अडीच वर्ष या नवीन आमदारांना विधिमंडळात प्रश्न कसे उपस्थित करायचे हे समजूनच घेता आले नाही. विधिमंडळात विविध नियमांखाली अनेक चर्चा होत असतात. त्यासाठी किमान वेळ ठरवून दिला जातो. मात्र, या चर्चेतही पक्षाचे वरिष्ठ नेतेच जास्त वेळ बोलत असल्याने नवख्या आमदारांना एम मत मांडण्याची, आपल्या मतदारसंघातील प्रश्न विचारण्याची संधी अत्यंत कमी प्रमाणात मिळाली.

मुळात प्रश्न कसे उपस्थित करावेत याची माहितीच नसल्याचा परिणाम त्यांच्या परफॉर्मन्सवर होत आहे. विधानसभेत आक्रमकपणे आपले मुद्दे कसे मांडावेत अशी इच्छा सर्वपक्षीय नव्या आमदारांनी उद्धव ठाकरे गटाच्या एका नेत्याकडे व्यक्त केली. त्यावर त्या नेत्याने नवख्या आमदारांना प्रशिक्षण देण्याची तयारी दाखविली.

तुम्ही नवीन आमदार माझ्याकडे आलात. पण, त्याची कल्पना तुमच्या वरिष्ठाना द्या. काय आहे सध्या कोण कुणासोबत आहे हेच कळत नाही. त्यामुळे उद्या तुम्ही आमच्यासोबत आलात, माझ्याबरोबर दिसलात तर तुमच्यावरही बंडखोर, गद्दार म्हणून शिक्का बसेल. त्याची काळजी घ्या, असे सांगत ‘या’ ठाकरे गटाच्या नेत्याने नेमके वास्तव्यावर बोट ठेवले.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?