AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता परीक्षेच्या आदल्यादिवशीही प्रवेश अर्ज करा, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवी नियमावली काय? वाचा सविस्तर

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेच्या आदल्या दिवशीही अर्ज करता येणार आहे. याबाबत सविस्तर लेखी आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं काढले आहेत.

आता परीक्षेच्या आदल्यादिवशीही प्रवेश अर्ज करा, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवी नियमावली काय? वाचा सविस्तर
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 7:55 PM
Share

मुंबई : राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणार एक मोठा निर्णय घेतला आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेच्या आदल्या दिवशीही अर्ज करता येणार आहे. परीक्षेचा अर्ज भरण्याचे विलंब शुल्क माफ केलं आहे, नियमित शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतलं जाणार आहे. राज्य सरकारने परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची विद्यार्थ्यांना परवानगी दिली आहे, त्यामुळे परीक्षेला मुकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

4 मार्चपासून बारावीची, 15 मार्चपासून दहावीची परीक्षा

येत्या 15 मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. कोरोनाकाळात दहावीच्या परीक्षा दोन वर्षे रद्द झाल्या आहेत. त्यामुळे दोन वर्षानंतर विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षा देणार आहेत, दोन वर्षे विद्यार्थ्यांना मुल्यमापनाच्या आधारे पास करण्यात आले होते. बारावीची परीक्षा येत्या 4 मार्चपासून सुरू होणार आहे. यात उशीरा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना आधी विलंब शुल्क भरावे लागत होते, मात्र आता विलंब शुल्कही सरकारकडून माफ करण्यात आले आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून नियमीत शुल्क घेतले जाणार आहे. याबाबत सविस्तर लेखी आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं काढले आहेत.

दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक आधीच जाहीर

याआधीच बोर्डाकडून आणि शिक्षणमंत्र्यांकडून दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रक वेळीच जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना तयारीसाठी व्यवस्थित वेळ मिळणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातल्या शाळा कोरोनामुळे बंद होत्या. मात्र मागील काही दिवसात कोरोनाचे आकडे कमी झाल्यानंतर राज्यातल्या शाळा सुरू करण्यात आल्या. आता पुन्हा ओमिक्रॉनने विद्यार्थी आणि पालकांची धास्ती वाढवली आहे, मात्र 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण लवकरच सुरू होणार असल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर त्यांची धाकधूक कमी होणास निश्चितच मदत होणार आहे.

Sudhir Mungantivar: महाविकास आघाडी सरकार म्हणजे चेहरा लोकशाहीचा, कृती हुकूमशाहीची; सुधीर मुनगंटीवार यांचा आरोप

Corona : मुंबईकरांना धडकी, कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ, एकाच दिवसात तब्बल 2 हजार 510 नवे रुग्ण

VIDEO : Salman Khan चालवतोय ऑटोरिक्षा, पनवेलमधला व्हिडिओ Viral

Follow Us
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.