AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर 15 दिवसातच नववधू प्रियकरासोबत पसार, दीड लाखांच्या दागिन्यांसह पोबारा

पहिल्या पतीने दिलेल्या तक्रारीवरुन पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला

लग्नानंतर 15 दिवसातच नववधू प्रियकरासोबत पसार, दीड लाखांच्या दागिन्यांसह पोबारा
| Updated on: Jul 26, 2020 | 4:42 PM
Share

अहमदनगर : लग्नानंतर अवघ्या 15 दिवसातच नववधूने प्रियकरासोबत धूम ठोकल्याची घटना समोर आली आहे. तरुणीने सासरच्या घरातील दीड लाखांचे दागिने घेऊन पोबारा केला. अहमदनगरमध्ये घडलेल्या या प्रकाराने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Newly wed wife run away with boyfriend in Ahmednagar)

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदामध्ये लग्न करुन आलेली बारामतीची तरुणी दोन आठवड्यातच पळून गेली. घरातील एक लाख 55 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन ती पसार झाली.

हेही वाचा : दोन वर्ष प्रेमसंबंध, पळून लग्न, 12 तासानंतर प्रेयसीकडून प्रियकराला घटस्फोट

या प्रकरणी पहिल्या पतीने दिलेल्या तक्रारीवरुन पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणी प्रियकरासोबत आळंदीला पळाली असून तिथे जाऊन त्या दोघांनी लग्न केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

हेही वाचा : लग्नानंतर देवदर्शनाला गेलेली नवरी प्रियकरासोबत पळाली

बारामती तालुक्यातील तरुणीचा विवाह 25 जूनला श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथे राहणाऱ्या युवकाशी झाला होता. लग्नापूर्वीच तिचे तरडोली गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे बोलले जाते. त्यानंतर 11 जुलैला पतीच्या घरातून जवळपास दीड लाख रुपये किंमतीचे दागिने घेऊन पसार झाली.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

दरम्यान, लग्नानंतर नवऱ्यासोबत देवदर्शनाला गेल्यानंतर नवविवाहिता चक्क प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना वर्षभरापूर्वी अहमदनगरमध्येच समोर आली होती. देवदर्शन आटोपल्यानंतर पती गाडी पार्किंगमधून काढण्यासाठी गेला. तिथे आधीच आलेल्या नवरीच्या प्रियकराने ही संधी साधली. त्याने आपल्या विवाहित प्रेयसीला बाईकवर बसवून धूम ठोकली होती. (Newly wed wife run away with boyfriend in Ahmednagar)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.