मोठी बातमी! NIA ची देशभरात छापेमारी, पुणे शहरातही शिजत होता भयंकर कट? दहशतवाद प्रकरणात…
NIA raids cyber terrorism : NIA ने सायबर दहशतवाद प्रकरणात 5 राज्यांमध्ये 5 ठिकाणी छापेमारी केली. पुणे शहरातही भयंकर कट शिजत होता? राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती लागले काय?

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सायबर दहशतवाद प्रकरणात 5 राज्यांमध्ये 5 ठिकाणी छापेमारी केली. या व्यापक धाडसत्रात यंत्रणेच्या हाती खूप काही लागले आहे. प्रकरणात यापूर्वीच 2 आरोपींना अटक केली आहे. हल्ल्यांसाठी आरोपींना तांत्रिक मदत व प्रशिक्षण देणाऱ्यांचा तपासातून शोध लागला आहे. पुणे शहरातही याविषयीचा कट शिजत असल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नरसह 5 ठिकाणी NIA ने छापे टाकले आहेत. त्यातून धक्कादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा सातत्याने देशातंर्गत सुरू असलेल्या सायबर दहशतवादी हल्ल्यांवर लक्ष ठेवून आहे. या छापासत्रामुळे आरोपींचे धाबे दणाणले आहे.
जुन्नरसह 5 ठिकाणी NIA चे छापे
गुजरात सायबर दहशतवाद प्रकरणात NIA ची देशभरात मोठी कारवाई पाहायला मिळाली. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नरसह 5 ठिकाणी NIA ने छापे मारले. यामध्ये गुजरातमधील नडियाद, तेलंगणातील रामागुंडम, बिहारच्या गोपालगंज आणि दिल्लीत छापे टाकण्यात आले. यामुळे दहशतवाद्यांची नवीन मोड्स ऑपरेंडी समोर आली. प्रकरणात यापूर्वीच 2 आरोपींना अटक केली आहे. हल्ल्यांसाठी आरोपींना तांत्रिक मदत व प्रशिक्षण देणाऱ्यांचा तपासातून शोध लागला आहे.
सरकारी यंत्रणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न
ऑपरेशन सिंदूरदरम्यान केंद्र सरकारच्या 54 वेबसाइट्सवर DDoS हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. सरकारी महत्त्वाच्या संगणकीय संसाधनांना लक्ष्य केल्याचे ही समोर आले. प्रकरणात यापूर्वीच 2 आरोपींना अटक, हल्ल्यांसाठी आरोपींना तांत्रिक मदत व प्रशिक्षण देणाऱ्यांचा तपासातून शोध घेण्यात येत आहे. कारवाईत 3 लॅपटॉप, 5 मोबाईल फोन, पेन ड्राइव्हसह डिजिटल उपकरणे व आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. गुजरात ATS ने दाखल केलेल्या प्रकरणाचा NIA कडून तपास सुरू आहे. या कारवाईमुळे देशभरातील प्रशासकीय वेबसाईट आणि लिंकवर हल्ला करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. तर देशातील काही शहरातून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपींचा तपास करण्यात येत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा ही भारताची केंद्रीय दहशतविरोधी आणि तपास संस्था आहे. मुंबईवरील 2008 च्या हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा कायदा, 2008 अंतर्गत तिची स्थापना करण्यात आली. ही संस्था देशाच्या सुरक्षेला आणि एकात्मतेला धोका पोहोचवणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करते.
