Nirupam on Shiv Sena | मुंबईच्या खराब परिस्थितीला केवळ शिवसेना जबाबदार; काँग्रेस नेते संजय निरुपम यांचे तोंडसुख

ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रंगलेला कलगीतुरा उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष असणाऱ्या काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनीही शिवसेनेवर शरसंधान साधले आहे.

Nirupam on Shiv Sena | मुंबईच्या खराब परिस्थितीला केवळ शिवसेना जबाबदार; काँग्रेस नेते संजय निरुपम यांचे तोंडसुख
संजय निरुपम
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 4:04 PM

नाशिकः मुंबई महापालिकेची निवडणूक ऐन तोंडावर आली असताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणारा काँग्रेस आक्रमक होताना दिसत आहे. मुंबईच्या खराब परिस्थितीला केवळ आणि केवळ शिवसेना (Shiv Sena) जबाबदार आहे, असा घणाघात शनिवारी काँग्रेस (Congress) नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये आले असता बोलत होते. यावेळी त्यांनी हाच मुद्दा आगामी महापालिकेत लावून धरणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला आहे. जाणून घेऊयात काय म्हणाले संजय निरुपम ते…

हे शिवसेनेचे अपयश

ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रंगलेला कलगीतुरा उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष असणाऱ्या काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनीही शिवसेनेवर शरसंधान साधले आहे. निरुपम म्हणाले की, मुंबई महापालिकेत शिवसेना सपशेल अपयशी ठरले आहे. मुंबईच्या खराब परिस्थितीला केवळ आणि केवळ शिवसेना जबाबदार आहे. शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील अपयश हाच काँग्रेसचा मुंबई महापालिकेतील निवडणुकीचा मुद्दा मुख्य मुद्दा असणार आहे, अशा शब्दांमध्ये निरुपम यांनी शिवसेनेवर आरोपाच्या फैरी झाडल्या आहेत. आता यावर शिवसेना काय प्रतिक्रिया देणार, याची उत्सुकता आहे.

निरुपमांचे विशेष प्रेम…

काँग्रेस नेते संजय निरुपम हे नेहमीच शिवसेनेला डिवचत राहतात. विशेषतः ते स्वतः पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे त्यांचे शिवसेनेवरचे हे विशेष प्रेम साऱ्यांनाच माहिती आहे. यापू्र्वीही त्यांनी परमबीर सिंह प्रकरणात एक ट्वीट करून खळबळ उडवून दिली होती. ते ट्वीटमध्ये म्हणाले होते की, हे मुंबई पोलिसांचे माजी पोलिस आयुक्त. मंत्र्यावर खंडणी वसुलीचा आरोप लावला होता. स्वत: पाच प्रकरणात वॉन्टेड आहेत. पोलिसांनी म्हटलं आहे की हे फरार आहेत. माहिती मिळाली आहे की ते बेल्जियमला आहेत. ते बेल्जियमला कसे गेले? यांना कुणी रस्ता मोकळा करुन दिला? आपण अंडरकव्हर अधिकारी पाठवून त्यांना परत आणू शकत नाहीत का? . आता त्यानंतर पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर निरुपम सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. ते शिवसेनेची अडचण करणार हे नक्की.

इतर बातम्याः

Nashik Trees | पर्यावरण मंत्र्यांच्या एका सूचनेमुळे 200 वर्षे पुरातन वटवृक्षासह 450 झाडे वाचणार, प्रकरण काय?

Jitendra Awhad | नाशिक महापालिकेने म्हाडाचे 700 कोटींचे नुकसान केले; आव्हाडांचा हल्लाबोल, चौकशी सुरू!

Good news for Nashik | नाशिकसाठी 346 कोटींचा वाढीव निधी मंजूर; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा काय?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.