5

गडकरींना लतादिदी आणि अटलजी यांची आठवण आली, म्हणाले मी दोनदाच हार खरेदी केला…

नितीन गडकरींना (Nitin Gadkari) लतादिदी आणि अटलजींची आठवण आली. मी आतापर्यंत दोनदाच हार खरेदी केला आहे. तो म्हणजे एकदा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि एकदा अटल बिहारी वाजपेयी (Atal bihari vajpeyi) यांच्यासाठी, अशी आठवण यावेळी गडकरींनी काढली.

गडकरींना लतादिदी आणि अटलजी यांची आठवण आली, म्हणाले मी दोनदाच हार खरेदी केला...
गडकरींनी हाराची आठवण सांगितलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 4:28 PM

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रसिद्ध क्रिकेटपटू व क्रीडा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांना क्रिकेटमधील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सीएसआर जर्नल या डिजिटल व प्रिंट प्रकाशनातर्फे हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी नितीन गडकरींना (Nitin Gadkari) लतादिदी आणि अटलजींची आठवण आली. मी आतापर्यंत दोनदाच हार खरेदी केला आहे. तो म्हणजे एकदा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि एकदा अटल बिहारी वाजपेयी (Atal bihari vajpeyi) यांच्यासाठी, अशी आठवण यावेळी गडकरींनी काढली. लता मंगेशकर यांची संपूर्ण देश पुजा करतो. गायन क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान कधीच विसरलं जाऊ शकत नाही. आणि अटल बिहारी वाजपेयी असे नेतृत्व होते की त्यांच्यावर विरोधकही प्रेम करतात. त्यामुळेच गडकरींनी हे वक्तव्य केले आहे.

गडकरी नेमकं काय म्हणाले?

मी कधी हार घेत नाही, मी कधी बॅनर लावत नाही, असे गडकरी सांगत होते. गडकरींना नेहीमे थेट बोलणारे नेते आणि अनेकांना धारेवर धरणारे नेते म्हणून ओळखले जाते. ते भरल्या सभेतून लोकांना बोलतात तुम्हा काम पटलं असेल तर मतं द्या अन्यथा देऊ नका. त्यांच्या कामांचा बोलबाला सध्या देशभर आहे. विरोधकही गडकरींच्या कामाचं कौतुक करता. त्यांचं साधेपण आणि कोणताही तामझाम न करता काम करत राहण्याच्या वृत्तीचे अनेकांना हेवा वाटतो. गडकरींसाठी आणि देशासाठी अटल बिहारी वाजपेयी आदर्श आहेत. तसेच भारतरत्न लता मंगेशकर यांचाही गडकरी आदर्श घेतता.

राज्यपाल काय म्हणाले?

या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे व डॉ मंदाकिनी आमटे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, सीएसआर जर्नलचे मुख्य संपादक अमित उपाध्याय व सहव्यवस्थापक योगेश शहा यांसह विविध कॉर्पोरेट्स व सार्वजनिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. देशातील विविध लोकोपयोगी सामाजिक प्रकल्प राबविण्यात कॉर्पोरेट्स आपल्या सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून मोठे योगदान देत आहेत. काही कॉर्पोरेट्स कायद्यातील अनिवार्य तरतुदींना अनुसरून सामाजिक कार्यांसाठी योगदान देतात, मात्र अनेक संस्था त्याही पलीकडे जाऊन स्वखुशीने अधिक योगदान देतात. समाजाच्या विकासासाठी कॉर्पोरेट सामाजिक दायित्वापेक्षा देखील नागरिकांचे स्वतःचे सामाजिक दायित्व अधिक महत्वाचे आहे असे सांगून समाजकार्यासाठी संपूर्ण जीवन निःस्वार्थपणे समर्पित करणाऱ्या देवतुल्य व्यक्तींचा देखील सन्मान करण्यात यावा अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

Devendra Fadnavis : मी ठरवलं की नंबर 1 येतोच, फडणवीसांचं पुन्हा आघाडीला आव्हान, 3 मार्कशीट जूळवून पहिले आल्याचाही टोला

काही चुकांमुळे Congress कमकुवत झालीय, सुशीलकुमार शिंदे यांचा पक्षाला आत्मचिंतन करण्याचा सल्ला

NARENDRA MODI कडून जपानच्या पंतप्रधानांना चंदनाच्या लाकडाचा ‘कृष्णपंख’ भेट, जाणून घ्या कृष्ण पंखाची खासियत ?

Non Stop LIVE Update
सरकारमध्ये लंगडी आणि कबड्डीचा खेळ, कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका
सरकारमध्ये लंगडी आणि कबड्डीचा खेळ, कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका
'लांडग्यांचं पिल्लू', आता 'लाचारांची औलाद', टार्गेट अजितदादा?
'लांडग्यांचं पिल्लू', आता 'लाचारांची औलाद', टार्गेट अजितदादा?
'आदित्य नाव बदनाम, ते प्राण्याला कसं देणार?', नेत्याची झोंबणारी टीका
'आदित्य नाव बदनाम, ते प्राण्याला कसं देणार?', नेत्याची झोंबणारी टीका
छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट, त्या निर्णयावर रोहित पवार यांची...
छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट, त्या निर्णयावर रोहित पवार यांची...
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल