AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओबीसी समाजाचा गुहागर तहसील कार्यालयावर मोर्चा; जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी

जिल्ह्यातील ओबीसी सामाजाने गुहागर तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी आरक्षण बचावच्या घोषणा देत जातीनिहाय जनगणनेची मागणी केली.

ओबीसी समाजाचा गुहागर तहसील कार्यालयावर मोर्चा; जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी
| Updated on: Nov 03, 2020 | 10:42 PM
Share

रत्नागिरी : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसी समाज आक्रमक झाले आहेत. अशातच जिल्ह्यातील ओबीसी समाजाने गुहागर तहसील कार्यालयासमोर आरक्षण बचाव आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी आरक्षण बचावच्या घोषणा देत जातीनिहाय जनगणनेची मागणी केली. (OBC community Demand for caste wise census in Guhagar)

मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजामध्ये असंतोष आहे. ओबीसी समाजाचीही सारखीच स्थिती आहे. यावेळी गुहागर येथे ओबीसी समाजाने आरक्षण बचावची मागणी करत इतरही मागण्या केल्या केल्या आहेत. यावेळी ओबीसी समाजाचे आंदोलक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ओबीसी सामाजाची जातीनिहाय जनगणना करावी. ज्यामुळे ओबीसींची प्रत्यक्ष संख्या समजण्यास मदत होईल. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण नको. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला भरीव मदत देण्यात यावी. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी. सर्व प्रकारच्या सेवा भरतींवरील स्थगिती उठवावी, अशा मागण्या यावेळी आंदोलकांकडून करण्यात आल्या.

दरम्यान, गुहागर ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ओबीसी प्रवर्गातील सर्व समाजाचे आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने गुहागर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, यांना निवेदन सादर करुन आपल्या मागण्या शासनासमोर मांडल्या.

संबंधित बातम्या :

Pune OBC Andolan | पुण्यात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन, आरक्षणप्रश्नी संघटना आक्रमक

मराठा आरक्षणावर आता तुम्हीच मार्ग काढा; मराठा आंदोलक शरद पवारांना भेटणार

मराठा आरक्षण समितीवरून चव्हाणांना हटवून एकनाथ शिंदेंना अध्यक्ष करा; नरेंद्र पाटील यांची मागणी

(OBC community Demand for caste wise census in Guhagar)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.