AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता शेतकरी रस्त्यावर उतरणार, थेट रस्ता रोको आणि रेल रोको करणार, कारण काय?

गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर घसरत असल्याने महाराष्ट्रातील कांदा शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने ₹१००० प्रति क्विंटल अनुदान आणि ₹३००० प्रति क्विंटल किमान भाव मिळण्याची मागणी केली आहे.

आता शेतकरी रस्त्यावर उतरणार, थेट रस्ता रोको आणि रेल रोको करणार, कारण काय?
farmer
| Updated on: Aug 31, 2025 | 6:03 PM
Share

गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर सातत्याने घसरत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. जर सरकारने कांद्याला किमान 1,000 रुपये प्रति क्विंटल अनुदान दिले नाही आणि येत्या काळात कांद्याचे बाजारभाव किमान 3,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले नाहीत, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनात रस्ता रोको आणि रेल रोकोचा समावेश असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल

सध्या कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी प्रती क्विंटल सुमारे 2,500 खर्च येतो, मात्र बाजारपेठेत मिळणारे दर त्याहून खूपच कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रती क्विंटल सुमारे ₹1,500 चा तोटा सहन करावा लागत आहे. या आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे, असेही भारत दिघोळे म्हणाले.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

संघटनाने सरकारकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. कांद्यावरील सर्व निर्बंध तातडीने हटवावेत. कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. देशांतर्गत बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी निर्यात थांबवणे हा उपाय चुकीचा आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे निर्यातीला सबसिडी देऊन परदेशात भारतीय कांद्याला स्पर्धात्मक बनवणे गरजेचे आहे, असेही भारत दिघोळे यांनी म्हटले.

तर शेतकरी रस्त्यावर उतरतील

याव्यतिरिक्त, संघटनेने असाही आरोप केला आहे की, कांद्याचे दर वाढू नयेत यासाठी काही घटकांकडून जाणीवपूर्वक षड्यंत्र रचले जात आहे. या षड्यंत्रामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत आहे. त्यामुळे सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी पावले उचलावीत. जर सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर शेतकरी शांत बसणार नाहीत. येत्या काळात कांद्याचे बाजारभाव किमान ₹3,000 प्रति क्विंटल झाले नाहीत तर शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि रस्ता रोको, रेल रोको यांसारखी आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधून घेतील, असे भारत दिघोळे यांनी स्पष्ट केले.

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच