.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुरोगामी महाराष्ट्रातील मन हेलावणारी घटना, बहिणीची सख्ख्या भावाला लग्नाला न येण्याची विनवणी

महाराष्ट्राची पुरोगामी अशी ख्याती आहे. या महाराष्ट्रातील संतांनी, महापुरुषांनी समाजातील जाचक रुढी, पंरपरा यांना थारा दिला नाही. त्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी अशी ख्याती मिळाली. पण या पुरोगामी महाराष्ट्रात आजही काही अनपेक्षित घटना घडत आहे हे अहदनगर येथील घटनेमुळे स्पष्ट झालं आहे.

पुरोगामी महाराष्ट्रातील मन हेलावणारी घटना, बहिणीची सख्ख्या भावाला लग्नाला न येण्याची विनवणी
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: tv9 marathi
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jun 02, 2023 | 7:24 PM
Share

अहमदनगर : मामा आणि भाच्याचं नातं किती छान असतं. भाच्याच्या लग्नात मामाचा चांगलाच थाट असतो. कारण लग्न लागतं तेव्हा मंगालाष्टकवेळी मामा आंतरपाट पकडतो. याशिवाय इतर महत्त्वाच्या विधींच्या वेळी मामा तिथे असणं जास्त गरजेचं असतं. पण अहमदनगरमधील एका मामाला जातपंचायतीच्या जाचामुळे आपल्या भाच्याच्या लग्नाला जाता आलेलं नाही. विशेष म्हणजे या मामा त्याच्या सख्ख्या बहिणीने आपल्या मुलाच्या लग्नाला हजर न राहण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे या प्रकरणाची अहमदनगर जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. विवाह सोहळा आयुष्यात वारंवार होत नाही. प्रत्येकाचा एकदाच विवाह पार पडतो. अशा कार्यक्रमाला सख्ख्या मामाने न येणं किंवा कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तीने जातपंचायतीच्या जाचामुळे न येणं ही दुर्देवी असल्याचं मत सर्वसामान्यांकडून व्यक्त केलं जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कुटुंबाला (वैदू) जातपंचायतने वाळीत टाकल्याने भाच्याच्या लग्नाला मामाला जाता आले नाही. जातपंचायतच्या दहशतीमुळे बहिणीने भावाला दुखःद अंतकरणाने चिठ्ठी लिहून लग्नाला येवू नये, असं आवाहन केलंय. त्यामुळे जातपंचायतचा जाच अजूनही कसा सुरू आहे हे यावरून स्पष्ट होतंय. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे वैदू समाजातील सुशिक्षित डॉ. चंदन लोखंडे गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील अनिष्ठ परंपरा विरोधात लढा देत आहेत. त्यामुळेच की काय जातपंचायतच्या पंचानी त्यांच्या कुटुंबावरच अघोषित बहिष्कार टाकलाय.

बहिणीचं भावाला पत्र

गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून चंदन लोखंडे यांच्या कुटुंबियांना कोणीही सुख-दुखःच्या वेळी बोलावत नाही. तसेच त्यांच्याकडेही कोण जात-येत नाहीय. चंदन लोखंडे यांच्या भाच्याचा 30 मे ला विवाह पार पडला. मात्र बहिणीने मुलाकरवी अगोदरच पत्र लिहून भावाला लग्नाला न येण्याचं आवाहन केलं. कारण जर लग्नाला हे लोक गेले तर लग्न मोडेल आणि 12 लाख रूपये दंडही द्यावा लागला असता.

जातपंचायतीने अघोषित बहिष्कार टाकल्याने कुटुंबातील मुलांची लग्न जमवणे कठीण झालंय. डॉ. चंदन लोखंडे सामाजातील अनिष्ठ प्रथा, परंपरा विरोधात लढा देत असल्याने आमच्यावर अघोषित बहिष्कार टाकण्यात आला आहे. आम्ही प्रचंड दहशतीखाली जगत असल्याचे लोखंडे कुटुंबीय सांगताय.

दोषींवर कारवाई करण्याची मागणी

पाच सात वर्षांपूर्वी जातपंचायती बंद झालेल्या असतानाही अघोषितपणे त्या आजही अस्तित्वात असल्याचे लोखंडे यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलंय. वैदू समाजाचे माजी प्रदेशाध्यक्ष कृष्णा शिंदे यांनी देखील या घटनेचा निषेध केलाय. त्यांनी दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

विशेष म्हणजे आज जग एकविसाव्या शतकात वाटचाल करत असताना काही समाज अजूनही आपल्या अनिष्ठ परंपरा सोडताना दिसत नाहीय. अशा समाजांनी रूढी, परंपरांना तिलांजली देण्याची आणि अघोषित जातपंचायती हद्दपार करण्याची गरज आहे.

Follow Us
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शदर पवार गटाचं विलीनीकर
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शदर पवार गटाचं विलीनीकरण... नेमकं काय घडतंय?
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
TET Paper Leak |  ठाणे पोलिसांची कारवाई; टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
Vidhan Parishad | शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या नेत्यांची नावे...
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
ब्रेकिंग! शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले; वर्षा बंगल्यावर नेमकं काय शिजलं?
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
Amravati Rain | अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील आठवडी बाजारात शिरले पाणी
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी