AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khalapur Landslide : अमित ठाकरे यांची पहिल्यांदाच शिंदे सरकारवर टीका; म्हणाले, हे आमदार फोडण्यात…

राजसाहेब ठाकरे यांनी आधीच इर्शाळवाडी घटनेबाबत सरकारचं लक्ष वेधले होते. अशी घटना घडू शकते, त्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे, असं राज ठाकरे यांनी आधीच सांगितलं होतं.

Khalapur Landslide : अमित ठाकरे यांची पहिल्यांदाच शिंदे सरकारवर टीका; म्हणाले, हे आमदार फोडण्यात...
amit thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2023 | 1:40 PM
Share

जळगाव | 21 जुलै 2023 : रायगडच्या जिल्ह्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतून 34 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली. त्यानंतर काल सकाळपासून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. आजही हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. इर्शाळवाडी हे गाव दरडग्रस्तांच्या यादीत नव्हतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत तेच सांगितलं. त्यामुळे सरकारवर टीका होत आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनीही शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

अमित ठाकरे हे जळगावच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना शिंदे सरकारवर टीका केली. हे आमदार फोडण्यात व्यस्त नस्ते तर दुर्घटना टाळता आली असती, अशी टीका अमित ठाकरे यांनी केली आहे. अमित ठाकरे यांनी पहिल्यांदाच शिंदे सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शिंदे सरकारवर टीका केली होती. त्यानंतर अमित ठाकरे यांनी निशाणा साधल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राजसाहेबांनी आधीच सांगितलं होतं

राजसाहेब ठाकरे यांनी आधीच इर्शाळवाडी घटनेबाबत सरकारचं लक्ष वेधले होते. अशी घटना घडू शकते, त्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे, असं राज ठाकरे यांनी आधीच सांगितलं होतं. पण सरकार आमदार फोडण्यात व्यस्त नसतं तर कदाचित ही दुर्घटना घडली नसती. इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडण्यापूर्वीच सरकारने लक्ष द्यायला हवं होतं. इर्शाळवाडीची दुर्घटना दुर्देवी आहे. सरकारने लक्ष द्यायला पाहिजे होतं, असी टीका अमित ठाकरे म्हणाले.

निवडणुकीत उत्तर मिळेल

सध्याच्या ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. त्या घडामोडी विरोधात मनसेने जी स्वाक्षरी मोहीम राबवली होती. त्यात मतदार किती संतापला आहे हे तुम्हाला दिसून आलं असेल. मतदार किती संतापला आहे याचं उत्तर तुम्हाला येत्या निवडणुकीत मिळेल, असंही ते म्हणाले.

मृतांचा आकडा 17 वर

दरम्यान, इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर गेला आहे. आज शोधकार्य सुरू असताना एक मृतदेह सापडला. सकाळीच इर्शाळवाडीत एनडीआरएफच्या चार टीम दाखल झाल्या आहेत. काल रात्री थांबलेलं रेस्क्यू ऑपरेशन आज सकाळी पुन्हा एकदा सुरू झालं आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...