AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khalapur Landslide : अमित ठाकरे यांची पहिल्यांदाच शिंदे सरकारवर टीका; म्हणाले, हे आमदार फोडण्यात…

राजसाहेब ठाकरे यांनी आधीच इर्शाळवाडी घटनेबाबत सरकारचं लक्ष वेधले होते. अशी घटना घडू शकते, त्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे, असं राज ठाकरे यांनी आधीच सांगितलं होतं.

Khalapur Landslide : अमित ठाकरे यांची पहिल्यांदाच शिंदे सरकारवर टीका; म्हणाले, हे आमदार फोडण्यात...
amit thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2023 | 1:40 PM
Share

जळगाव | 21 जुलै 2023 : रायगडच्या जिल्ह्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतून 34 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली. त्यानंतर काल सकाळपासून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. आजही हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. इर्शाळवाडी हे गाव दरडग्रस्तांच्या यादीत नव्हतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत तेच सांगितलं. त्यामुळे सरकारवर टीका होत आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनीही शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

अमित ठाकरे हे जळगावच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना शिंदे सरकारवर टीका केली. हे आमदार फोडण्यात व्यस्त नस्ते तर दुर्घटना टाळता आली असती, अशी टीका अमित ठाकरे यांनी केली आहे. अमित ठाकरे यांनी पहिल्यांदाच शिंदे सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शिंदे सरकारवर टीका केली होती. त्यानंतर अमित ठाकरे यांनी निशाणा साधल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राजसाहेबांनी आधीच सांगितलं होतं

राजसाहेब ठाकरे यांनी आधीच इर्शाळवाडी घटनेबाबत सरकारचं लक्ष वेधले होते. अशी घटना घडू शकते, त्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे, असं राज ठाकरे यांनी आधीच सांगितलं होतं. पण सरकार आमदार फोडण्यात व्यस्त नसतं तर कदाचित ही दुर्घटना घडली नसती. इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडण्यापूर्वीच सरकारने लक्ष द्यायला हवं होतं. इर्शाळवाडीची दुर्घटना दुर्देवी आहे. सरकारने लक्ष द्यायला पाहिजे होतं, असी टीका अमित ठाकरे म्हणाले.

निवडणुकीत उत्तर मिळेल

सध्याच्या ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. त्या घडामोडी विरोधात मनसेने जी स्वाक्षरी मोहीम राबवली होती. त्यात मतदार किती संतापला आहे हे तुम्हाला दिसून आलं असेल. मतदार किती संतापला आहे याचं उत्तर तुम्हाला येत्या निवडणुकीत मिळेल, असंही ते म्हणाले.

मृतांचा आकडा 17 वर

दरम्यान, इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर गेला आहे. आज शोधकार्य सुरू असताना एक मृतदेह सापडला. सकाळीच इर्शाळवाडीत एनडीआरएफच्या चार टीम दाखल झाल्या आहेत. काल रात्री थांबलेलं रेस्क्यू ऑपरेशन आज सकाळी पुन्हा एकदा सुरू झालं आहे.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....