AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाशिवरात्रीनिमित्त भक्तांनी फुलले अंचलेश्वर मंदिर; जाणून घ्या मंदिराचा इतिहास

चंद्रपूर शहरातील प्राचीन वास्तूंपैकी अंचलेश्वर मंदिर हे एक. झरपट नदीच्या तीरावर वसलेलं हे मंदिर पुराच्या पाण्यामुळं ब-याच अंशी ढासळले होते.

महाशिवरात्रीनिमित्त भक्तांनी फुलले अंचलेश्वर मंदिर; जाणून घ्या मंदिराचा इतिहास
| Edited By: | Updated on: Feb 18, 2023 | 12:44 PM
Share

चंद्रपूर : चंद्रपूरातील अंचलेश्वर मंदिर हे भगवान शिवाचं मंदिर. या मंदिराच्या गाभा-यात एक नैसर्गिक जलकुंड आहे. ऐतिहासिक मान्यतेनुसार, जलकुंडातील पाणी हे पवित्र मानलं जातं. तिथंच बाजूला शिवलिंग स्थापित आहे. राणी हिराईनं पंधराव्या शतकात या जलकुंडाचं महत्त्व अनुभवल्यानंतर या मंदिराचा कायापालट केला. तेव्हापासूनच या मंदिराला भक्तांच्या दृष्टीनं महत्त्व प्राप्त झालं. महाशिवरात्री असो वा श्रावण महिना इथं भक्तांची मोठी गर्दी उसळते. इतिहास अभ्यासकांच्या मते या मंदिरातील जलकुंडातील पाणी राजा खांडक्या बल्लाळशा यानं आपल्या अंगावर घेतल्यानं त्याच्या अंगावरील फोडं नाहीसे झाले. तो वेदनेतून मुक्त झाला आणि त्यामुळंच इथं भव्य मंदिराची उभारणी झाली.

चंद्रपूर शहरातील प्राचीन वास्तूंपैकी अंचलेश्वर मंदिर हे एक. झरपट नदीच्या तीरावर वसलेलं हे मंदिर पुराच्या पाण्यामुळं ब-याच अंशी ढासळले होतं. पण आता त्याच्या डागडुजीचं पुरातत्व विभागानं हाती घेतलेले काम पूर्ण झाले आहे. त्यामुळं येणा-या पिढ्यांनासुद्धा मंदिर महात्म्य कळू शकणार आहे.

पाण्याला आयुर्वेदिक महत्त्व

पंधराव्या शतकातील हे मंदिर राणी हिराई यांनी बांधलं आहे. येथे शिवलिंग नाही, तर कुंड आहे. येथे जे पाणी येते ते औषधीयुक्त आहे. राजाचा कुष्टरोज या पाण्यामुळे नाहीसा झाला होता. ते येथे भाविकांनी तीर्थ म्हणून वाटले जाते. शिवपार्वतीचा लग्नसोहळा म्हणून शिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो, असं एका भाविकानं सांगितलं. दुसरा भाविक म्हणाला, कोरोनानंतर महाशिवरात्रीचं दर्शन घेता येत आहे. येथील मंदिर हे पुरातन असल्यानं भक्तिभावाने लोकं येथे येतात. बल्लारशाहाचं ऐतिहासिक वारसा लाभलेलं असं हे मंदिर आहे. याची ऐतिहासिक कथाही आहे. या कथेचं महात्मे संपूर्व विदर्भात प्रचलीत आहे.

नागराधामच्या प्राचीन मंदिरात भाविकांची गर्दी

गोंदिया जिल्ह्यातील नागराधाम मंदिरात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विविध भागातील भाविक मोठ्या प्रमाणात गाभ्याऱ्यातील शिव लिंगाचे दर्शन घेण्यासाठी येतात. तसेच संपूर्ण परिसर ‘बम बम भोले’च्या गजराने दुमदूमन निघत असतो. मंदिरातील गाभारा आज रात्री १२ वाजतापासूनच भक्तांसाठी खुला करण्यात आला आहे. भाविक दुरूनच पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेत आहे. गोंदिया येथे असलेले हे नागरधाम मंदिराची वास्तू दगडातून बांधलेली आहे. अत्यंत मनमोहक असे या मंदिराचे बांधकाम आहे. या मंदिराचे इतिहास म्हणजे गीताप्रेस गोरखपूर येथे प्रकाशित होणाऱ्या कल्याण मासिक १९५१ पत्रिकेमध्ये या मंदिराचा उल्लेख देखील केलेला आहे. यावरून हे मंदिर किती प्राचीन आहे हे लक्षात येते.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.