कोरोना थोतांड, वारकऱ्यांनो रस्त्यावर उतरा, मंदिराची कुलुपे तोडा : संभाजी भिडे

| Updated on: Jul 12, 2021 | 2:56 PM

कोरोना म्हणजे थोतांड आहे. सरकार हे थोतांड का वाढवत आहे कळत नाही, मात्र हे सर्व देशात चाललेले षडयंत्र आहे", असं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) म्हणाले.

कोरोना थोतांड, वारकऱ्यांनो रस्त्यावर उतरा, मंदिराची कुलुपे तोडा : संभाजी भिडे
संभाजी भिडे
Follow us on

सांगली : “कोरोना म्हणजे थोतांड आहे. सरकार हे थोतांड का वाढवत आहे कळत नाही, मात्र हे सर्व देशात चाललेले षडयंत्र आहे”, असं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) म्हणाले. ते सांगलीत (Sangli) बोलत होते. इतकंच नाही तर वारकरी (Pandharpur Wari) रस्त्यावर उतरले पाहिजेत, मंदिराची कुलुपे तोडायला हवीत, असंही संभाजी भिडे म्हणाले. पंढरपूरच्या वारीवर घातलेल्या बंदीला वारकर्‍यांनी विरोध करून रस्त्यावर उतरायला हवं होतं, असं त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, संभाजी भिडे यांनी कोरोनाबाबत केलेलं हे वक्तव्य पहिलंच नाही. त्यांनी यापूर्वीही अनेकवेळा कोरोना थोतांड असल्याचं म्हटलं आहे.

पुढारी लोक काय लायकीचे?

संभाजी भिडे यांनी देशात आणि राज्यातील कोरोना परिस्थितीवरुन शंका उपस्थित केली आहे. महाराष्ट्रात आज भगवंतांचे नामकरण करत वारीला जाण्यासाठी बंदी घालण्यात आली. कारण काय तर वारीमुळे कोरोन वाढू शकतो. मात्र कोरोना म्हणजे थोतांड आहे. निव्वळ थोतांड आहे, कोरोना वगैरे काही नाही, लॉकडाऊनमुळे जेवढं वाटोळं झालंय. सरकारचा अत्यंत चुकीचा निर्णय, पुढारी लोक काय लायकीचे आहेत ते माहिती आहे. एकजात सर्वजण स्वार्थी आहेत असं संभाजी भिडे म्हणाले.

वारी झाली असती तर कोरोना दिसला नसता 

या कोरोनामुळे आज देशात काय घडलं असेल,तर लोकांमध्ये फक्त भीतीचं आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वारीला जर बंदी घातली नसती,तर देशात एकही उदाहरण मिळालं नसतं की कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. माझं मत आहे की, कोरोना हे षडयंत्र आहे. देशाचे हे दुर्दैव आहे, असं संभाजी भिडेंनी नमूद केलं.

पंढरपूरच्या वारीला बंदी घातल्यानंतर वारकर्‍यांनी रस्त्यावर उतरायला हवे होते. एकादशी दिवशी बंदी घातले जाते, त्यावेळी मंदिरांची कुलुपं तोडून टाकून मंदिर उघडी करायला पाहिजे, असंही संभाजी भिडे म्हणाले.

वारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

आषाढी वारीला परवानगी द्या, वारी होत नसल्यामुळे कोरोना वाढत आहे. त्यामुळे वारीला परवानगी द्या, म्हणजे कोरोना जाईल, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काही दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. वारीला परवानगी देण्याची मागणी करण्यासाठी संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायाचे प्रमुख आणि शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदन दिलं. मानाच्या पालख्यांचे वाहनातून प्रस्थान न करता मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पायी वारी झाली पाहिजे, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली.

VIDEO : संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

संबंधित बातम्या 

वारीवर बंदी घालून द्रौपदीच्या पदाराला हात घालण्याचं सरकारकडून पाप,संभाजी भिडे यांची टीका

आषाढी वारीला परवानगी द्या, वारी होत नसल्यामुळेच कोरोना वाढतोय, संभाजी भिडेंचं वक्तव्य

Coronavirus is conspiracy, Pandharpur wari should be allowed said Sambhaji Bhide in sangli Maharashtra